संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Friday, November 12, 2010

हिन्दवी-स्वराज्याच पाहिलं पान

सूर्याची किरणे गारव्याला होती जाळत, शिवनेरीवर भगवाही होता खेळत,
येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहुल,
शिवजन्माच पडणार होत पाहिलं मराठी पाउल ........

मराठ्यांचा प्रत्येक अश्रू, जिजाऊन साठवला होता,
आई भवानीस तेच अश्रू देऊन, पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता .....
मंदिर थरारली,शिवनेरीवर तोफ कडाडली, वाऱ्याची कोवळी झुळूक दऱ्या खोऱ्यात दरवळली
जिजाऊपोटी मराठ्यांचा राजा अवतरला, सांगत मुकी पाखर हि किलबिलली .........


नगरा वाजला शाही साज चढला, डंका डोंगराआड सांगत सुटला,
आता सह्याद्रीवर भगवा फडकणार, मराठ्याची तलवार शत्रूवर धडकणार..........
पाहिलं पान शिवजन्मान लिहल गेल होतं,
हिरव्या दगडावर आता भगव रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.....!

- "जय भवानी, जय शिवाजी"

कलाकुसर - Make Hanging Jar Lanterns ...

Make Hanging Jar Lanterns ...

Materials:
1) Assorted sizes and styles of glass jars with a lip
2) Fine gage metal wire
3) Wire cutters
4) Needle nose pliers
5) Votive candles


Steps :-

1) Collect small jam jar sized glass jars with a lip just below the top. If it is transparent then you can paint on it whatever you like. eg - small star, small candle, flowers etc. it will look good.


2) Take a long piece of wire and bend it around the jar just under the lip so that a ring is formed. With the needle nose pliers twist the wire together close to the jar to secure the ring. When tightening the wire be sure to leave a little give so that you can attach the handle.


3) Once the ring is created you will have 2 approximately 8 inch long wires originating from the point where the circle is twisted closed.


4) Bend the excess wires over the top of the jar and attach them to the wire ring to create a handle.


5) Place a votive candle inside the jar. Then you can close the jar. but make sure that the closing part should have small small holes.


6) Hang it in a tree with sturdy branches, far enough from the end of the branch, so the jar won't slip off in the wind. Light the candles to create a magical effect.


7) Caution should be used with any open flame; do not leave candles burning unsupervised.

Saturday, November 6, 2010

प्रांतोप्रांतीची दिवाळी


अविनाश बिनीवाले , शनिवार , ६ नोव्हेंबर २०१०

          दिवाळी हा सण भारतातल्या सगळ्याच प्रांतांमध्ये साजरा केला जातो. घरासमोर दररोज सकाळ-संध्याकाळ नव्यानं काढली जाणारी रांगोळी हे दिवाळीचे अखिल भारतीय वैशिष्टय़ आहे. या सणासाठी बनविल्या जाणाऱ्या गोडधोड आणि तिखट पदार्थात मात्र वेगळेपण आढळते. दीपावली हा भारतीय उपखंडातला अत्यंत महत्त्वाचा, अतिशय आनंदाचा सण. तो जवळजवळ सर्वच ठिकाणी अतिशय उत्साहानं साजरा केला जातो, यात काही संशय नाही. हा सण प्राचीन काळापासून इतका महत्त्वाचा आहे, लोकांच्या अक्षरश: रक्तात भिनलेला आहे, की नंतरच्या काळात भारतात आलेल्या काही इतर विचारधारेच्या लोकांनाही ‘दीपावलि’ साजरी करण्याचा मोह दूर ठेवता आला नाही.. येत नाही.

            अशी ही दिवाळी अखिल भारतीय आहे! भल्या पहाटे उठून घरासमोर रांगोळी काढण्याची परंपरा देशातल्या सर्वच प्रांतांत आहे. फरक असतो तो तिच्या आकारात, रंगात किंवा रांगोळी म्हणून वापरायच्या पदार्थात! काश्मीर व हिमाचल प्रदेशात खूप मोठमोठय़ा रांगोळ्या काढल्या जातात. पंजाब-राजस्थानातही त्या तशा मोठय़ा असतात. परंतु महाराष्ट्र नि उत्तर कर्नाटकातली रांगोळीची परंपरा किंचित वेगळी आहे. ठिपके काढून ते जोडणारी लहान, पण रेखीव नि कलात्मक रांगोळी या प्रांतांमध्ये काढली जाते. आंध्र प्रदेशात किंवा आणखी दक्षिणेत तांदळाच्या पिठाचा उपयोग रांगोळी काढण्यासाठी होतो. साधं पीठ घेऊन किंवा तांदळाच्या पिठाच्या खडूसारख्या कांडय़ा करून त्यानं रांगोळी काढली जाते. घरासमोर रोज- किंबहुना दररोज सकाळ-संध्याकाळ नव्यानं काढली जाणारी रांगोळी हे अखिल भारतीय वैशिष्टय़ आहे.



फराळाचे पदार्थही खरं तर अखिल भारतीय स्वरूपाचेच आहेत. त्यात असते ती किरकोळ प्रादेशिकता आणि किंचित फेरबदल. उदाहरणार्थ- आपल्याकडे कडा मुडपण्यावरून ‘करंजी’ आणि ‘कान्होला’ असा किंचित फरक आहे. पण उत्तर भारतात असा भेद नाही. कशीही असली तरी तिला ‘गुजिया’च म्हणतात नि त्यातलं सारणही आपल्याकडच्यासारखंच असतं. अनारसा हा पदार्थही खूप ठिकाणी होतो. उदाहरणार्थ बिहारमध्येही अनारसा असतो, पण त्याचा आकार खूप वेगळा असतो. गोलसर लाडवासारखा नि त्यात मुख्य घटक खवा असतो. तो खसखशीत घोळलेला असतो नि त्याची पारीही आपल्या अनारशासारखीच असते. आपल्याकडे खूपशी साखर किंवा गूळ घालून शंकरपाळे केले जातात. तर काश्मीरमध्ये पिठात फारसा गूळ घालत नाहीत, पण नंतर ते पाकात घोळवून कौशल्यानं कोरडे करतात. या पाकातल्या शंकरपाळ्यांना तिकडे ‘तोशे’ म्हणतात. साधे नि गोड चिरोटे, रवा, रवा-बेसन (म्हणजे राघवदास), फक्त बेसन, बुंदी, मोतिचूर असे लाडवांचे अनेक प्रकार नि आकारही! आकार केवळ छोटे-मोठे एवढंच नाही तर गोल, किंचित चौकोनीकडे झुकणारे.. असे बरेच प्रकार. अनेक ठिकाणी बेसनाच्या लाडवात सढळ हातानं साजूक तुपाचा वापर केलेला असतो. परिणामत: तसा खूप तुपाचा, खरपूस भाजलेला (मस्त) लाडू थाळीत ठेवल्यावर मात्र जरा ढेपाळतो. पण काहीही बिघडत नाही. मस्त लागतो! अधूनमधून तोंडात टाकायला, किंवा विशेषत: चहाबरोबर तोशे छान वाटतात. गुजिया म्हणजे करंज्यासुद्धा लहान-मोठय़ाच नाही, तर विविध प्रकारचं सारण भरलेल्या असतात. महाराष्ट्रात ओल्या नारळाच्या करंज्यांचं खूपच कौतुक असतं. पण उत्तरेत ओला नारळच जरा अवघड असल्यामुळे तिकडे सामान्यत: करंज्या कोरडय़ा खोबऱ्याच्याच असतात. आसाममध्ये मात्र ओल्या नारळाचा उपयोग ज्यात त्यात केलेला दिसतो. आसाममध्ये खोबऱ्याचा चिवडा करतात. ओलं खोबरं किसणीवर लांब लांब किसायचं. (खवायचं नाही.) मग ते ओलं खोबरं पिठीसाखरेत घोळायचं आणि हळूहळू कोरडं करायचं. कोरडं झाल्यावर त्यात वेलदोडय़ाची पूड पेरायची- की खोबऱ्याचा गोड चिवडा तयार! (आता हा प्रकार करताना त्यात आपण काजू, बेदाणे वगैरे घालायला हरकत नाही. मुळातच खोबरं किसून झाल्यावर त्यावर केशराचं पाणी शिंपडलं तर त्याला सुंदर केशरी रंग येतो नि केशराचा वासही छान येतो. या दिवाळीत करून पाहा. टिकाऊपणासाठी केशराचं पाणीच वापरा, दुधात मिसळलेलं केशर नको.)


या विविध गोड, गोडसर पदार्थाच्या जोडीनं अनेक प्रकारच्या चकल्या, शेवेचे अनेक प्रकार, गाठियाचे अनेक आकार नि चवी, कडबोळी, चिवडे, खमण (खमणाचा एक गोड प्रकारही असतो- मिठू खमण. महाराष्ट्रात तो फारसा कुठे दिसत नाही, पण गुजरातमध्ये सर्वत्र असतो.), मध्य प्रदेशात तिखट नि तिखटजाळ शेवेचे अनेक प्रकार आढळतात. या तिखट- नमकीन पदार्थाचेही किती किती प्रकार आहेत! त्यांची मोजदाद करणंही एक मोठं काम आहे!


अखिल भारतीय परिप्रेक्ष्यात दिवाळीचा विचार केला की, आपल्या पूर्वजांचं खरोखर; कौतुक वाटतं. आपले सगळ्यांचे पूर्वज नक्कीच एक असले पाहिजेत. त्याशिवाय इतक्या गोष्टी समान झाल्याच नसत्या!


दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे उठून अभ्यंगस्नान करून मस्त फराळ केल्यावर (लगेच किंवा दोन-तीन तासांनी) दही-पोहे खायची पद्धतही सर्वत्र आहे. (याला केवळ योगायोग म्हणता येईल का?) दही-पोहे सर्वत्र असले तरी त्यात चवीला आणखी काय घालायचं, यात फरक दिसतो. महाराष्ट्रात दही-पोह्याला जिऱ्याची तुपातली फोडणी घातली जाते नि चवीला किंचित साखर घालतात. (यात हिरवी मिरचीही छान लागते.) काहीजण दही-पोह्यात साखर अजिबातच घालत नाहीत. पण उत्तरेत दही-पोह्यात भरपूर साखर घातली जाते. गंगा-यमुनेच्या संगमापुढच्या प्रदेशात- म्हणजे उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात, बिहार, झारखंड, पूर्व नि पश्चिम बंगाल, आसाम वगैरे सर्व ठिकाणी दही-पोह्यात गोडीसाठी गूळ घातला जातो. उत्तर प्रदेश, बिहार भागात दही-पोह्यात उसाचा गूळ घालतात. बंगाल-आसाम भागात सर्वसामान्य लोक ताडगूळ घालतात, तर श्रीमंत मंडळी खजुरीचा गूळ घालतात.


दिवाळीच्या चार दिवसांत नवनवे कपडे घालून दिवसभर मस्त मस्त पदार्थ खाणं (त्याला ‘चरणं’ म्हणणं अधिक योग्य ठरेल.) हाच महत्त्वाचा कार्यक्रम असतो. दक्षिणेत या काळात (खरं तर प्रत्येक सणालाच) देवळात जाणं फार महत्त्वाचं- किंबहुना सर्वात महत्त्वाचं असतं. उत्तर भारतात, विशेषत: गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागांत दिवाळीत पैसे लावून पत्ते खेळण्याची परंपरा आहे. उत्तर प्रदेशात नि बिहारमध्येही जुगार खेळण्याची पद्धत दिसते. महाराष्ट्रात मात्र सुदैवानं ती नाही. पण अलीकडे काही लोक असलं काहीतरी करायला लागले आहेत असं दिसतं. उत्तर भारतात बहुतेक ठिकाणी लक्ष्मीपूजनानंतरच्या प्रतिपदेला नवं वर्ष (विक्रम संवत्) सुरू होतं.


बंगालमध्ये मात्र दिवाळीचा थाट जरा कमी असतो. तिकडे दिवाळीच्या अगोदरच्या पंधरवडय़ात प्रतिपदा ते विजयादशमी हा दहा दिवसांचा काळ ‘पूजा’ म्हणून साजरा होतो. आपल्याकडे दिवाळी अंक निघतात तसे तिकडे पूजा विशेषांक निघतात. आपण दिवाळीत जे करतो ते सगळं बंगालमध्ये पूजाकाळात केलं जातं. ओरिसातही पूजा उत्सव खूप महत्त्वाचा असतो, पण दिवाळीही असतेच. बिहार, झारखंड वगैरे भागांत दिवाळीचा कालखंड आणखी थोडा पुढे सरकतो नि तिथे षष्ठीला साजरा होणारा ‘छटपूजा’ हा दिवस खूपच महत्त्वाचा असतो. (खरं तर हा दिवाळीचाच एक भाग आहे. यानिमित्तानं काही गैरप्रकार होत असतील तर त्याला जरूर विरोध करावा, पण छटपूजेलाच विरोध करणं मात्र समजू शकत नाही! मराठी माणसानं प्रथम समजून घेतलं पाहिजे की, छटपूजा हा दिवाळीचाच एक भाग आहे!)


केरळ नि तामिळनाडू हे प्रदेश मात्र या दिवाळीपासून जरा वंचित राहिलेले दिसतात. त्याला कदाचित भौगोलिक कारण असावं. आपल्याकडे पावसाळा संपून स्वच्छ आकाशाचा, सुखद थंडीचा ऋतू सुरू झालेला असतो नि नेमक्या याच वेळी केरळ-तामिळनाडूत ईशान्य मोसमी वाऱ्यांचा पावसाळा सुरू होत असतो. मग ऐन पावसात दिवे कसे लावणार? दीपोत्सव कसा साजरा करणार? तिकडे दिवाळीचं काही महत्त्व नाही, असं काहीजण म्हणतात. तर यानिमित्तानं ‘आमची संस्कृती वेगळी आहे,’ असं काही फुटीरवादी म्हणतात. पण हे खरं नाही. हा फरक भौगोलिक आहे. तेही आपलेच आहेत. त्यांची दिवाळी तिकडच्या ऋतूंनुसार होते.


दिवाळी हा फक्त हिंदूंचा सण आहे, हेही तितकंसं खरं नाही. भारतातल्या ख्रिश्चनांचा नाताळ किंवा मुसलमानांची ईद पाहा. काय वेगळं असतं त्यात? दिवाळीच असते ती! आपल्याकडे आपण नाही का कधी कधी टिळक पंचांगाची दिवाळी वेगळी साजरी करतो? जुन्या पंचांगाची दिवाळीही साजरी करतो! तशीच डिसेंबरात येते ती येशूची दिवाळी असते नि ईदला येते ती मुसलमानांची दिवाळी! तेच फराळाचे पदार्थ (अधिक वाटल्यास केक किंवा चिकन/ मटण वगैरे), घरावर तोच आकाशकंदील आणि तीच रोषणाई, घरासमोर कागदावरची तयार रांगोळी.. तेलाचे दिवे नसले तरी विजेचे दिवे असतातच. म्हणजे भारतात खरं तर दरवर्षी तीन- तीन दिवाळ्या साजऱ्या होत असतात!

Friday, November 5, 2010

दिवाळी करु या... 'सुहितमय'


श्रावणापासूननच आपल्या मनात या सणांच्या आगमनाची प्रतिक्षा असते. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा अशा उत्साहाचे वातावरण निर्माण करणार्‍या सणांचे एकामागोमाग आगमन होते. दिवाळीचा सण म्हणजे आनंदाचा सण. दिव्यांच्या रोशणाईला या सणात अनन्यसाधारण महत्त्व असते. जगातील अंधार दूर सारुन सारे काही प्रकाशित करण्यासाठी आकाशदिवे,पणत्या, दिव्यांच्या माळा लावल्या जातात. प्रत्येक घरात प्रकाश निर्माण होऊन सर्वत्र प्रसन्न आणि आनंददायी वातावरणाची निर्मिती होते. हा आनंद निर्माण करण्यामध्ये सुहित जीवन ट्रस्टच्या मतिमंद शाळेचे विद्यार्थ्यांचाही वाटा आहे.


दिवाळीच्या दिवसांमध्ये आत्मविश्वासाने आपल्या मतिमंदत्वावर, कर्णबधिरतेवर मात करुन परिसर प्रकाशमय करण्याचे स्वप्न सुहित जीवन ट्रस्टच्या 'सुमंगल' या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिवाळीच्या विविध वस्तू स्वहस्ताने बनविल्या आहेत. मंत्रालय परिसरातील सोसायटीच्या आवारात या मुलांनी आपल्या वस्तुंचा स्टॉल लावला आहे. यामध्ये आकाश कंदिल, पणत्या, रांगोळी, दिवे यासारख्या विविध वस्तू विक्रीला ठेवल्या आहेत. साधारणपणे २५ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या वस्तू येथे उपलब्ध आहेत. या मुलांनी मोठय़ा कल्पकतेने या वस्तू तयार केल्याचे प्रकर्षाने जाणवते. या वस्तूंना पाहिल्यावरच निर्मितीचा आनंद आणि त्या मुलांनी घेतलेले परिश्रम जाणवतात.


दीपज्योती हे चिरंतन सर्वात्मक परमेश्वराचे प्रतिक आहे. आणि या प्रतिकाच्या माध्यमातूनच आपल्या जीवनातील अंधारमय बाजू विसरुन ही मुले सर्वत्र प्रकाश पसरवायचे काम करीत आहे. ही शाळा या मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. रायगड जिल्ह्यातील पेण येथे जून २००४ मध्ये ही शाळा सुरु करण्यात आली आहे. या विशेष मुलांना शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी व सक्षम बनवून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे.


या मुलांचा दर्जा वाढावा, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होताना अडचणी येऊ नये तसेच त्यांची बौद्धीक तसेच शारिरीक क्षमता व गरजा ओळखून त्यांना प्रशिक्षित करुन सक्षमही बनविण्यात येत आहे. संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा पाटील या मुलांच्या विकासासाठी सातत्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. गेली चार वर्ष दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुहितच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ताने बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येते. गणेशोत्वाच्या काळातही श्रीगणेशाच्या मुर्ती आणि सजावटीचे साहित्य यांची विक्रीही करण्यात येते. या संस्थेतील मुलींना सक्षम करण्यासाठी त्यांना मेहंदी, शिवणकाम, कलाकुसरीच्या कामाबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ह्या मुली लग्न, साखरपुडा, मुंज इत्यादी कार्यक्रमात मेहंदी काढून अर्थाजन करीत असतात. अशा या मतिमंद मुला-मुलींनी तयार केलेल्या वस्तूंच्या स्टॉलला एकदा भेट देऊन आपण काहीतरी खरेदी करायलाच हवं याची जाणीव झाली आणि दरवर्षी या मुलांनी बनविलेल्याच वस्तू खरेदी करण्याचा संकल्पही केला.


दिपावलीच्या शुभ मुहुर्तावर हे दिवे, पणत्या आकाश कंदील खरेदी करुन एक दिवा या मुलांसाठीही लावूया. या स्टॉलच्या माध्यमातून ही मुले या दिव्यांप्रमाणेच आपले आयुष्यही ज्ञानप्रकाशात उजळविण्याचे आपल्याला आवाहन करीत आहेत. चला तर मग आपणही या ज्ञानप्रकाशाचे एक घटक होऊ या आणि ही दिवाळी 'सुहितमय' करु या !.

- मनिषा पिंगळे

Wednesday, November 3, 2010

चला करू या प्रकाशपर्वाचे स्वागत


शुभांगी कात्रेला

दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार... असं म्हणत आपण लहानाचे मोठे होतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. दिवाळी हा सण मोठा विलक्षण, भुरळ घालणारा. दर वर्षी तितकाच नवा वाटणारा आणि व्यापून परत मागे उरणारा हा सण स्नेहाचा, मायेचा, ज्योतीने ज्योत तेवण्याचा, प्रकाशवाटेने पुढे जाण्याचा...

माणसाच्या हातांना शुभंकरतेचा उत्तरस्पर्श मुळातच लाभलेला असतो. या शुभंकराततून साकरलेली समृद्धी निसर्गात दाटून आलेली असतानाच, दीपावलीची पावले घरावाड्यांशी, शेतीभाताशी थबकतात. भरलेले माप ओलांडून दीपावली येते आणि आसमंत उजळून टाकते.


दिवाळी सांगते, उठा, जागे व्हा, ताजेतवाने व्हा. दाटलेल्या उजेडाची पूजा बांधा. या पूजेने मनाचा कणा ताठ होऊन जाईल. दृष्टीच्या कक्षा विशाल होतील. भलीमोठी हिंमत उराशी बांधली जाईल आणि आपल्या सोबत अष्टौप्रहर वावरणारी अंधकाराची भीती दूर होईल. प्रकाश म्हणजे आयुष्यात उभारीने ठाम राहण्याची हिंमत देणार प्रसाद. प्रकाशाच्या पूजेने तो मनाच्या ओंजळीत येतो.


असे म्हणतात, की आफ्रिकेच्या जंगलात दूर कोठेतरी पक्ष्यांची एक जमात आहे, पहाटपक्ष्यांची. हा पक्षी रात्र जागवितो. पहाट फटफटू लागली की झाडाच्या उंच शेंड्यांशी जातो. तृषार्त असतो. प्रकाशकिरणांची प्रतीक्षा करीत असतो. पहिला किरण चोचीत झेलतो, न चुकता. अगदी एखादा क्षणभरच. तेवढ्यानने त्यांची तृष्णा शांत होते. मग तो त्याच झाडाच्या अंधारलेल्या ढोलीच गाढ झोपी जातो. त्याचा सारा दिवस तेथेच जातो. सायंकाळ होते. अंधार भरभरून येतो.अंधाराशी रात्रभर झगडण्याचे बळ त्याला पहिल्या प्रकाशकिरणाच्या प्राशनाने मिळते. केवळ एका क्षणाच्या अवकाशात त्याने आनंदाचा पूर्ण चंद्र ओंजळीत झेलून घेतलेला असतो!


रात्री भरून आलेला अंधार आपल्याला जाणवतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे, की तो केवळ रात्रीपुरताच असतो. आजच्या धकाधकीत, मानसिक ताणतणावात अंधार दाटून येण्याचे प्रसंग केव्हाही येतात. अशा वेळी आपल्याला या आफ्रिकन पहाटपक्ष्याच्या वाटेवरून जाता यायला हवे. त्यासाठीच आपण प्रकाशपर्वाचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे आणि निर्मळ मनाने त्याची पूजा बांधली पाहिजे.

राम, कृष्ण, बुद्ध, महावीर या सगळ्यांच्या आयुष्यातल्या संस्मरणीय घटनांशी दिवाळीचा अतूट ऋणानुबंध जोडलेला आहे. आपण सूर्याच्या जवळ जाऊ शकत नाही. तसेच या माणसांच्या कर्तृत्वाच्या जवळपासही आपण जाऊ शकत नाही, पण स्वत:ची कुवत आपण निश्‍चित ओळखू शकतो. जशी मातीच्या इवल्या पणतीने ओळखली होती आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याला अभिवचन दिलं होतं, "अंधारात मी पळेन आणि माझ्या शक्तीनुसार प्रकाशाचे हात देऊन अंधाराला परतून लावेन'. तसेच अभिवचन आपले आपणच स्वत:ला देऊ शकतो, "मी भ्रष्ट परिस्थितीशी, अंधारलेल्या भवितव्याशी, भयाण दहशतवादाशी लढेन. माझ्या शक्तीनुसार सकारात्मक विचारांच्या प्रकाशाचे हात पसरेन आणि हा अंध:कार नाहीसा करेन...' एवढा संकल्प जरी या दिवाळीत करता आला, तरी चैतन्याच्या दिवाळीची खरी ज्योत लावल्याचे समाधान मिळेल.