संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Tuesday, October 12, 2010

Indian Air Force Day


The Indian Air Force (IAF) is The Air Arm of the Indian armed forces. Its primary responsibility is to secure Indian airspace and to conduct aerial warfare during a conflict. It was officially established on 8 October 1932 as an auxiliary air force of the Indian Empire and the prefix Royal was added in 1945 in recognition of its services during World War II.


After India achieved independence from the United Kingdom in 1947, the Royal Indian Air Force served the Union of India, with the prefix being dropped when India became a republic in 1950.


Since independence, the IAF has been involved in four wars with neighbouring Pakistan and one with the People's Republic of China. Other major operations undertaken by the IAF include Operation Vijay - the invasion of Goa, Operation Meghdoot and Operation Cactus. Apart from conflicts, the IAF has been an active participant in United Nations peacekeeping missions.


The President of India serves as the Commander-in-Chief of the IAF. The Chief of Air Staff, an Air Chief Marshal (ACM), is a four star commander and commands the Air Force. There is never more than one serving ACM at any given time in the IAF. One officer has been conferred the rank of Marshal of the Air Force, a 5-star rank and the officer serves as the ceremonial chief.


With strength of approximately 170,000 personnel and 1,300 aircraft, The Indian Air Force is the world's fourth largest air force after the United States Air Force, Russian Air Force and China's People's Liberation Army Air Force. In recent years, the IAF has undertaken an ambitious expansion and modernisation program to replace its aging Soviet-era fighter jets.

Mission

The IAF's mission is defined by the Armed Forces Act of 1947, Constitution of India and the Air Force Act of 1950, in the aerial battlespace, as:


“Defense of India and every part thereof including preparation for defense and all such acts as may be conducive in times of war to its prosecution and after its termination to effective demobilization.”


A Westland Wapiti, one of the first aircraft of the Indian Air Force.


The Indian Air Force was established in British India as an auxiliary air force of the Royal Air Force with the enactment of the Indian Air Force Act 1932 on 8 October that year and adopted the Royal Air Force uniforms, badges, brevets and insignia.


On 1 April 1933, the IAF commissioned its first squadron, No.1 Squadron, with four Westland Wapiti biplanes and five Indian pilots. The Indian pilots were led by Flight Lieutenant (later Air Vice Marshal) Cecil Bouchier. Until 1938, No. 1 Squadron remained the only squadron of the IAF, though two more flights were added.


The Air Force grew to seven squadrons in 1943 and to nine squadrons in 1945. The IAF helped in blocking the advance of the Japanese army in Burma, where its first air strike was on the Japanese military base in Arakan. It also carried out strike missions against the Japanese airbases at Mae Hong Son, Chiang Mai and Chiang Rai in northern Thailand. In recognition of the crucial role played by the IAF, King George VI conferred it the prefix "Royal" in 1945.


During the war, many youth joined the Indian National Army. Forty five of them (known as the Tokyo Boys) were sent to train as fighter pilots at the Imperial Japanese Army Air Force Academy in 1944 by Subhas Chandra Bose. After the war, they were interned by the Allies and were court-martialled. After Indian independence, some of them rejoined the IAF for service.

History

The Indian Air Force was established in British India as an auxiliary air force of the Royal Air Force with the enactment of the Indian Air Force Act 1932 on 8 October that year and adopted the Royal Air Force uniforms, badges, brevets and insignia. On 1 April 1933, the IAF commissioned its first squadron, No.1 Squadron, with four Westland Wapiti biplanes and five Indian pilots. The Indian pilots were led by Flight Lieutenant (later Air Vice Marshal) Cecil Bouchier. Until 1938, No. 1 Squadron remained the only squadron of the IAF, though two more flights were added.


During World War II, the red blob was removed from the IAF roundel to eliminate confusion with the Japanese Red Sun Emblem. The Air Force grew to seven squadrons in 1943 and to nine squadrons in 1945. The IAF helped in blocking the advance of the Japanese army in Burma, where its first air strike was on the Japanese military base in Arakan. It also carried out strike missions against the Japanese airbases at Mae Hong Son, Chiang Mai and Chiang Rai in northern Thailand.


In recognition of the crucial role played by the IAF, King George VI conferred it the prefix "Royal" in 1945. During the war, many youth joined the Indian National Army. Forty five of them (known as the Tokyo Boys) were sent to train as fighter pilots at the Imperial Japanese Army Air Force Academy in 1944 by Subhas Chandra Bose. After the war, they were interned by the Allies and were court-martialled. After Indian independence, some of them rejoined the IAF for service.

Land-Based Air Defence

The IAF currently operates the S-125 Pechora and the 9K33 Osa as Surface-to-air missile systems. The IAF is also currently inducting the Akash medium range surface-to-air missile system. A total of 8 squadrons has been ordered so far.



Ballistic missiles

The IAF currently operates the Prithvi-II short-range ballistic missile. The Prithvi-II is an IAF-specific variant of the Prithvi ballistic missile.

Anti-Ballistic missile systems

The S-300 SAM serves as an Anti-Tactical Ballistic Missile system in the IAF. The S-300 is also able to detect, track, and destroy incoming cruise missiles and low-flying aircraft.

चैत्रांगणातून संस्कृती शिक्षण

रांगोळी हा विषयच असा आहे की तो शब्द जरी कानावर पडला तरी मराठी माणसाच्या चेह-यावर स्मितरेषा उमटतेच. पुण्या-मुंबईकडे ठिपक्यांच्या पण आधुनिक रांगोळ्या काढण्याची पद्धत आहे. त्यांना आपल्या संस्कृतीत विशेष असे महत्व दिसत नाही. अशाच रांगोळ्या अगदी अमेरिकेत पण काढण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली जिल्हा व उत्तर कर्नाटक म्हणजे बेळगाव जिल्हा या ठिकाणी दरवर्षी चैत्र महिन्यात रोजच तुळशीवृंदावनापुढे चैत्रांगण काढायची पद्धत आहे. वसंत ऋतूत थंडी संपून धरतीमाता नवे हिरवे वस्त्र धारण करू लागलेली असते. तिचे स्वागत करण्यासाठी बायका आपले अंगण या रांगोळ्यांनी सजवतात.
चैत्रांगणात बहुतेककरून पारंपारिक रांगोळ्या रेखाटण्याची प्रथा आहे. शंख, चक्र, गदा, पद्म, चंद्र, सूर्य, गोपद्म व स्वस्तिक या रांगोळ्या काढण्याची प्रथा भारतभर दिसून येते. शंख, चक्र, गदा, पद्म ही विष्णूची चार आयुधे. एखादे युद्ध पुकारायचे असल्यास त्याची शत्रूला ग्वाही देण्यासाठी शंख वाजवण्याची प्रथा रामायण, महाभारत काळात होती. चक्र म्हणजे सुदर्शन चक्र व गदा ही शत्रूशी युद्ध करतांना वापरावयाची शास्त्रे होत. कमळ हे माणसाच्या मनाच्या शुद्धतेच द्योतक आहे. आकाशातील चंद्र तारे व सूर्य हे पृथ्वीचे रक्षक व पोशक आहेत. पृथ्वीवर होणारे असंख्य उल्कापात चंद्र झेलतो. त्यामुळे पृथ्वी सुरक्षित रहाते. सूर्यामुळे पृथ्वीवरचे जीवन शक्य होते. स्वस्ति हा शब्द सु आणि अस्ति अशा दोन शब्दांनी बनलेला आहे. त्याचा अर्थ 'चांगले असो' असाच आहे. स्वस्तिक म्हणजे चांगले करणारा. गोपद्म म्हणजे गाईची पावले. हिंदू धर्मात गाईचे महत्व असायचे कारण म्हणजे हिंदू संस्कृती ही शेतीप्रधान होती. शेतीसाठी बैल लागतात. गायीचे रक्षण केले तरच बैल निपजू शकतात.
चैत्रातील शुद्ध तृतीयेपासून ते वैशाखातील अक्षयतृतीयेपर्यंत तुळशीवृंदावनासमोर चैत्रांगण काढायची पद्धत असते. त्यात चैत्रगौरीचा पाळणा, पंखे, प्रवेशद्वार, नागफूले यांचा प्रामुख्याने समावेश असतो असा पाळणा काढायची पद्धत काही वन्य जमातीतही आढळते. चैत्रगौर म्हणजे धरणीमाता. हिवाळ्यातील बोचरी थंडी संपून आता चैत्र महिन्यात झाडांना हिरवी पालवी फुटू लागलेली असते. चैत्रगौरी बरोबर तिची मैत्रीणपण काढायची पद्धत आहे. दोघीजणी हिरवे वस्त्र लेऊन नटल्या आहेत. पार्वतीला चैत्रगौर म्हणतात. तेव्हा तिच्याबरोबर तिची सखी हवीच. वसंत ऋतूपासून हवा गरम होऊ लागते. त्यांना गरम होणा-या हवेत थंडावा देण्यासाठी दोन्ही बाजूला दोन वाळ्याचे पंख काढायचीपण पद्धत आहे. दोन्ही पंखे समान मापाचे पण त्याचबरोबर एकमेकांचे आरशातील प्रतिबिंब असावेत, तसे काढण्यात कौशल्य असते.
 शिवाय मोर, हत्ती, मासा, हंस, तुळशी वृंदावन, शंकराची पिंड, गाय-वासरू, गरुड वगैरे गोष्टी काढायची पण प्रथा दिसून येते. माणसाने राजहंसाप्रमाणे असावे असे म्हणतात. हंस जसा त्याच्यासमोर दूध व पाणी मिसळून ठेवले असता फक्त त्यातील दुध पितो व पाणी वगळतो असा समज आहे, त्याप्रमाणे माणसाने नेहमी चांगल्याची निवड करावी अशी हिंदू धर्मात शिकवण आहे. पोपटाचे पण महत्व गीता-ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहे. पोपट जसा एखाद्या नळीवर बसला व चुकून त्याचे खाली डोकं वर पाय झाले तर त्याला जग कसे सगळे उलटे दिसेल, त्याच प्रमाणे माणसाला या जगाविषयी भ्रम असतो, असे म्हटले आहे. तसच सरस्वतीचे वाहन मोरच का? मोराच्या पिसात विलक्षण ज्ञान भरलेले आहे. त्याचा खरा रंग कसा असतो. परंतु भोतीकशास्त्रातील डिफ्रॅक्शन म्हणून ही गोष्ट असते त्याच्या कारणाने सूर्यप्रकाश पिसावर पडला की त्याच्या विभाजनाने रंगांचा विलोभनीय आकृतिबंध दिसतो. हत्तीला गजलक्ष्मी म्हटलेले आहे. ज्याला हत्ती पाळणे शक्य असते, त्याच्याकडे संपत्ती असणे साहजिकच आहे.
खालील ठिपक्यांच्या रांगोळीत मी खास पारंपारिक मराठी रांगोळ्या असे म्हणते. नारळ, स्वरस्वती, बिल्वपत्र व चक्रव्यूह या रांगोळ्या महाराष्ट्राशिवाय इतर ठिकाणी दिसत नाहीत. कोयरी, कासव, नाभिकमळ व ज्ञानकमळ या रांगोळ्या महाराष्ट्रात व कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू यांच्या हद्दीवर दिसतात.
नारळ: ही खास कोकणची रांगोळी. नारळाचे आपल्या संस्कृतीतले महत्व सुपरीचीतच आहे. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. त्याचा प्रत्येक भाग हा उपयोगी असतो. देवासमोर नारळ फोडणे म्हणजे आपला अहं मोडणे होय.

सरस्वती: विद्येची देवता म्हणून सर्वांनाच माहित असते.

लक्ष्मी: धनाची देवता म्हणून सर्वांनाच माहित असते.

कोयरी: कैरी या शब्दाचा हा अपभ्रंश किंवा कोकणातील आंब्याच्या कोयीचे हे चित्रण.

बिल्वपत्र: बेलाचे पान शंकरला वाहतात. त्याला तीन दले असतात. तसेच तीन भाग बिल्वपत्र या रांगोळीत असतात.

कासव: कासवाचे महत्व भारतीय संस्कृतीत असण्याचे करण म्हणजे विष्णूच्या दहा अवतारांपैकी कासव हा दुसरा अवतार. ते पाण्यात तसेच जमीनीवर राहू शकते. देवळातून जमीनीवर कासव कोरण्याची म्हणून प्रथा आहे.

नाभिकमळ: यात विश्वाच्या उत्पत्तीचे वर्णन दडलेले आहे. भगवान विष्णूच्या नाभीतून (बेंबीतून) ब्रम्हकमळ उगवले व त्यात ब्रम्हा विराजमान होते. त्यांनीच पुढे सृष्टीची निर्मिती केली आहे अशी पुराणात आख्यायिका आहे.

ज्ञानकमळ: कमळ चिखलात उगवते पण त्याला जसा चिखल लागलेला नसतो ते स्वच्छ असते त्याप्रमाणे माणसाचे ज्ञानही शुद्ध असावे. पुर्वग्रहदुषित नसावे अशी शिकवण आहे.

चक्रव्यूह: महाभारतातील अभिमन्यूची कथा सर्वांनाच माहित असते. या रांगोळीच्या आकारात द्रोणाचार्यानी व्यूह रचला होता. त्यात शिरायचे कसे हे त्याला माहित होते परंतु बाहेर कसे पडायचे ते माहीत नव्हते.
सर्वच रांगोळ्या नजरेला सुंदर दिसतात. त्याचे कारण म्हणजे त्यातील सममिती. काही अपवाद (सुर्य, शंख, सरस्वती व चक्रव्यूह) सोडले तर बहुतेक सर्वच रांगोळ्यात चक्रीय सममिती असते. परंतु ठिपके काढून काढलेल्या पारंपारिक रांगोळ्यांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्या रांगोळ्याचा एक मूळ आकृती बंध असतो. तसच प्रत्येक आकृती बंधात एखादे विशिष्ट गणिती प्रमेय असते. मूळ आकृतीबंधातून मग मोठे आकृती बंध बनवता येतात. या क्रियेला गणितात इटरेशन वा पुनरावृत्ती म्हणतात. अशाप्रकारे रांगोळ्या काढतांना एकीकडे मनाला मिळणा-या आनंदाबरोबर नकळतपणे गणिताचा अभ्यासही होतो.
रोज रांगोळी काढण्याचे बरेच फायदे आहेत. कलात्मकतेबरोबरच, समान अंतरावर ठिपके काढण्यात कौशल्य असते. तसेच मनाची एकग्रता व शिस्त वाढते. रांगोळी काढण्याबरोबर ती पाहणा-यालाही एक प्रकारचा सात्विक आनंद मिळतो. शिवाय आपल्या हिंदू संस्कृतीच्या शिकवणीत त्यातून सतत आठवण रहाते व नकळत गणीती प्रमेयांचा अभ्यास होतो हा तर केवडा मोठा वाटा आहे. सध्याच्या युगांत विशेषत: पुणे-मुंबई ठिकाणी वा अमेरिकेत रोज अंगणात जरी या रांगोळ्या काढणं शक्य नसलं तरी शाळेत चित्रकलेच्या तासाला त्या शिकणं यातून बरच काही साध्य होऊ शकेल.


माधुरी बापट
१६६६ साउथ कॅटस रेन लेन
थॅचर, अँरीझोना.

"ICE" (In Case of Emergency) Campaign



We all carry our mobile phones with names & numbers stored in its memory but nobody, other than ourselves, knows which of these numbers belong to our closest family or friends.


If we were to be involved in an accident or were taken ill, the people attending us would have our mobile phone but wouldn't know who to call. Yes,there are hundreds of numbers stored but which one is the contact person in case of an emergency? Hence this "ICE" (In Case of Emergency) Campaign


The concept of "ICE" is catching on quickly. It is a method of contact during emergency situations. As cell phones are carried by the majority of the population, all you need to do is store the number of a contact person or persons who should be contacted during emergency under the name "ICE" (In Case Of Emergency).

The idea was thought up by a paramedic who found that when he went to the scenes of accidents, there were always mobile phones with patients, but they didn't know which number to call. He therefore thought that it would be a good idea if there was a nationally recognized name for this purpose. In an emergency situation, Emergency Service personnel and hospital Staff would be able to quickly contact the right person by simply dialling the number you have stored as "ICE."


For more than one contact name simply enter ICE1, ICE2 and ICE3 etc. A great idea that will make a difference!

Let's spread the concept of ICE by storing an ICE number in our** **Mobile phones today!** **


Please forward this. It won't take too many "forwards" before everybody will know about this It really could save your life, or put a loved one's mind at rest **.** **

**Remember:-


**ICE will speak for you when you are not able to** *

Dr. A. P. J. Abdul Kalam

Dr. Abdul Kalam's Letter to Every Indian


Why is the media here so negative?
Why are we in India so embarrassed to recognize our own strengths, our achievements?
We are such a great nation. We have so many amazing success stories but we refuse to acknowledge them. Why?
We are the first in milk production.
We are number one in Remote sensing satellites.
We are the second largest producer of wheat.
We are the second largest producer of rice.
Look at Dr. Sudarshan , he has transferred the tribal village into a self-sustaining, self-driving unit.. There are millions of such achievements but our media is only obsessed in the bad news and failures and disasters.
I was in Tel Aviv once and I was reading the Israeli newspaper. It was the day after a lot of attacks and bombardments and deaths had taken place. The Hamas had struck. But the front page of the newspaper had the picture of a Jewish gentleman who in five years had transformed his desert into an orchid and a granary. It was this inspiring picture that everyone woke up to. The gory details of killings, bombardments, deaths, were inside in the newspaper, buried among other news.
In India we only read about death, sickness, terrorism, crime.. Why are we so NEGATIVE? Another question: Why are we, as a nation so obsessed with foreign things? We want foreign T.Vs, we want foreign shirts. We want foreign technology.
Why this obsession with everything imported. Do we not realize that self-respect comes with self-reliance? I was in Hyderabad giving this lecture, when a 14 year old girl asked me for my autograph. I asked her what her goal in life is.. She replied: I want to live in a developed India . For her, you and I will have to build this developed India . You must proclaim. India is not an under-developed nation; it is a highly developed nation...
YOU say that our government is inefficient.
YOU say that our laws are too old.
YOU say that the municipality does not pick up the garbage.
YOU say that the phones don't work, the railways are a joke. The airline is the worst in the world, mails never reach their destination.
YOU say that our country has been fed to the dogs and is the absolute pits.
YOU say, say and say.. What do YOU do about it?
Take a person on his way to Singapore . Give him a name - 'YOURS'. Give him a face - 'YOURS'. YOU walk out of the airport and you are at your International best. In Singapore you don't throw cigarette butts on the roads or eat in the stores. YOU are as proud of their Underground links as they are.. You pay $5 (approx. Rs.. 60) to drive through Orchard Road (equivalent of Mahim Causeway or Pedder Road) between 5 PM and 8 PM. YOU come back to the parking lot to punch your parking ticket if you have over stayed in a restaurant or a shopping mall irrespective of your status identity… In Singapore you don't say anything, DO YOU? YOU wouldn't dare to eat in public during Ramadan, in Dubai .. YOU would not dare to go out without your head covered in Jeddah.
YOU would not dare to buy an employee of the telephone exchange in London at 10 pounds (Rs..650) a month to, 'see to it that my STD and ISD calls are billed to someone else.'YOU would not dare to speed beyond 55 mph (88 km/h) in Washington and then tell the traffic cop, 'Jaanta hai main kaun hoon (Do you know who I am?). I am so and so's son. Take your two bucks and get lost.' YOU wouldn't chuck an empty coconut shell anywhere other than the garbage pail on the beaches in Australia and New Zealand ..
Why don't YOU spit Paan on the streets of Tokyo ? Why don't YOU use examination jockeys or buy fake certificates in Boston ??? We are still talking of the same YOU. YOU who can respect and conform to a foreign system in other countries but cannot in your own. You who will throw papers and cigarettes on the road the moment you touch Indian ground. If you can be an involved and appreciative citizen in an alien country, why cannot you be the same here in India ?
In America every dog owner has to clean up after his pet has done the job. Same in Japan .. Will the Indian citizen do that here?' He's right. We go to the polls to choose a government and after that forfeit all responsibility.





We sit back wanting to be pampered and expect the government to do everything for us whilst our contribution is totally negative. We expect the government to clean up but we are not going to stop chucking garbage all over the place nor are we going to stop to pick a up a stray piece of paper and throw it in the bin. We expect the railways to provide clean bathrooms but we are not going to learn the proper use of bathrooms.
We want Indian Airlines and Air India to provide the best of food and toiletries but we are not going to stop pilfering at the least opportunity. This applies even to the staff who is known not to pass on the service to the public.
When it comes to burning social issues like those related to women, dowry, girl child! and others, we make loud drawing room protestations and continue to do the reverse at home. Our excuse? 'It's the whole system which has to change, how will it matter if I alone forego my sons' rights to a dowry.' So who's going to change the system?
What does a system consist of? Very conveniently for us it consists of our neighbours, other households, other cities, other communities and the government. But definitely not me and YOU. When it comes to us actually making a positive contribution to the system we lock ourselves along with our families into a safe cocoon and look into the distance at countries far away and wait for a Mr.Clean to come along & work miracles for us with a majestic sweep of his hand or we leave the country and run away.
Like lazy cowards hounded by our fears we run to America to bask in their glory and praise their system. When New York becomes insecure we run to England . When England experiences unemployment, we take the next flight out to the Gulf. When the Gulf is war struck, we demand to be rescued and brought home by the Indian government. Everybody is out to abuse and rape the country. Nobody thinks of feeding the system. Our conscience is mortgaged to money.
Dear Indians, The article is highly thought inductive, calls for a great deal of introspection and pricks one's conscience too….. I am echoing J. F. Kennedy's words to his fellow Americans to relate to Indians…..

'ASK WHAT WE CAN DO FOR INDIA AND DO WHAT HAS TO BE DONE TO MAKE INDIA WHAT AMERICA AND OTHER WESTERN COUNTRIES ARE TODAY'


Lets do what India needs from us.
Forward this mail to each Indian for a change instead of sending Jokes or junk mails.

Thank you,
Dr. A. P. J. Abdul Kalam

I humbly request you to forward this to every Indian……

http://www.youtube.com/watch?v=laGZaS4sdeU

आंतरराष्ट्रीय टिळक


लोकमान्य टिळकांच्या राजकीय कर्तृत्त्वाचे बरेचसे पैलू अपरिचित राहिले आहेत. स्वराज्यासाठी झटणारा, देशबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रज सरकारशी टक्कर घेणारा, परखड विचार असलेला लोकमान्य नेता , टिळकांच्या या व अशा अनेक पैलूंची सर्वसामान्यांना ओळख आहे. मात्र, भारताची राजकीय चळवळ प्रभावी करतानाच जागतिक स्तरावर भारताचे प्रश्न समजून सांगण्यात टिळकांनी जी महत्त्वाची भूमिका बजावली त्याबद्दल जास्त चर्चा झालीच नाही.


जागतिक स्तरावर तत्कालीन नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. आज सारख्या दळणवळणांच्या साधनांचा विकास नसताना टिळक नेहमी अपटूडेट होते. जागतिक स्तरावर घडणा-या घटनाघडामोडींची माहिती त्यांना होती. जागतिक राजकारण आणि भारत याची स्पष्ट जाण त्यांना होती. जगाच्या पाठीवर होणा-या स्थित्यंतराचा भारताने कसा वापर करून घेतला पाहिजे हे त्यांनी पूर्णपणे ओळखले होते.


''स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच'', या लोकमान्यांच्या चैतन्यदायी शब्दांनी असंख्य भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्वाळा उफाळून आली. लोकांमध्ये स्वराज्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी टिळकांनी लेखणी आणि वक्तृत्व यांचा प्रखरतेने आणि प्रभावीपणे वापर करून घेतला. राजकीय नेत्यांचे प्रमुख कार्य सध्याच्या समस्यांतून आणि पेचप्रसंगातून जनतेची सोडवणूक करणे, हे असते. लोकमान्यांनी त्यांच्या काळातील सर्व समस्यांना तोंड दिले आणि त्या सुटाव्यात यासाठी त्यांनी सरकारशी सतत संघर्ष केला. हे करताना त्यांनी भविष्याचा वेध घेतला. आंतराराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू बळकटपणे मांडली.


भारताच्या स्वातंत्र्यासाठी करावयाच्या चळवळी भारतातच कराव्यात. यासाठी इंग्लडमध्ये शिष्टमंडळे पाठविण्याची गरज नाही असे टिळकांचे मत होते. परंतु पहिले महायुध्द पेटले. इंग्लडची ठिकठिकाणी पीछेहाट होऊ लागली. त्यांचे सेनादल अपूरे पडू लागले. ब्रिटीश सरकारच्या अडचणीचा फायदा घेण्याचे टिळकांनी ठरविले. भारताकडून इंग्लडला मनुष्यबळ, युद्धसामुग्रीच्या उत्पादनात मदत केली जात होती. स्वराज्याचे हक्काची रोखठोक व्यवहारी मागणी त्यांनी प्रत्यक्षात राज्यकर्त्या इंग्रजांकडे आणि त्यांच्या सामान्य मतदार नागरिकांकडे करण्याचे ठरविले आणि इंग्लडमध्ये प्रत्यक्ष जाऊनच हक्क मागण्याचा निर्धार केला. मात्र, यात अडचण होती त्यांनी भोगलेल्या शिक्षेची. राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे कारावासाची शिक्षा भोगलेल्या टिळकांना इंग्लडला जायची परवानगी मिळणे कठीण होते. त्यात युद्धाची धुमश्चक्री सुरू असल्याने इंग्रजांनी राजकीय कारणांमुळे इंग्लडला जाण्याची परवानगी नाकारली. या कोंडीतून त्यांनी मार्ग काढला.


ब्रम्हदेशातील मंडाले तुरुंगात सहा वर्षांचा कारावास भोगून आलेल्या टिळकांचे शरीर थकले होते. पायाला जखम झाली होती. मात्र, एका योद्धयाला शोभेल अशा आवेषात त्यांनी मातृभूमीसाठी इंग्लडला जाण्याचा निर्णय घेतला. २४ सप्टेंबर १९१८ ला त्यांनी मुंबईच्या बंदरावर बोटीत पाय ठेवला आणि पस्तीस दिवसांच्या प्रवासानंतर २९ ऑक्टोबरला ते लंडनला पोहचले. त्यांच्यासमवेत चित्रशाळेचे वासुकाका जोशी , कायद्याचे सल्लागार दादासाहेब करंदीकर आणि वैयक्तिक कार्यवाह म्हणून गणेश महादेव नामजोशी गेले होते.


त्यावेळी इंग्लंडमधील राजकारणात कॉन्झरवेटीव्ह पार्टी आणि लिबरल पार्टी हे दोन प्रमुख पक्ष होते. त्याचबरोबर लेबर पार्टी नव्याने उदयास येत होती कॉन्झरवेटिव्ह पक्षाचे नेते कट्टर साम्राज्यवादी होते. लिबरल पक्षातील काही नेत्यांना भारताला हळूहळू राजकीय हक्क दिले पाहिजेत, याची जाणीव होती. लेबर पार्टी नव्यानेच स्थापन झाली होती. असे असूनही टिळकांनी, लेबर पार्टीशी आपण संबंध जोडणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, हे त्यांना अचूक ओळखले होते.


टिळक लंडनला पोहचल्यावर त्यांनी अनेक सहका-यांशी गाठीभेटी घेतल्या, इंग्लड सरकारला स्वातंत्र्याची मागणी करणारी अनेक पत्रे पाठविली, भारतातील संबंधीतांशी चळवळीसंबंधी पत्रव्यवहार केला. अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या निमित्ताने टिळक लंडनला आले तो व्हॅलेंटाइन चिरोलवरील दावा २९ जानेवारी १९१९ला सुरु झाला. अकरा दिवस चाललेल्या या दाव्याचा निकाल टिळकांच्या विरूद्ध बाजूने लागला. टिळक विजयी झाले असते तर सरकारवर आरिष्ट कोसळले असते, त्यामुळे त्यांना हा निकाल अपेक्षीत होता. साधारण एक वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजे २७ ऑक्टोबर १९१९ या दिवशी ते मुंबईला परतले. लोकमान्यांनी इंग्लडमधील आपल्या वास्तव्यातील कार्याचा धडाक्याने पाठपुरावा केला.


टिळकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हाती धरलेली मशाल स्वतः पुरतीच मर्यादीत न ठेवता त्याद्वारे अनेक विश्वासू सहका-यांना चेतविले. इंग्लडमध्ये भारताची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी टिळकांना श्यामजी कृष्ण वर्मा हे विश्वासू सहकारी मिळाले. वर्मा यांनी पूर्वी सौराष्ट्रातील काही संस्थानांमध्ये दिवाणाचे काम केले. ते इंग्लडला गेले आणि बॅरिस्टर होऊन त्यांनी त्या व्यवसायात उत्तम यश मिळविले. टिळकांच्या सूचनेवरून वर्मा यांनी लंडनमध्ये इंडियन सोशिऑलॉजिस्ट हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. त्यातून भारताच्या दारिद्रयाचे विदारक चित्र आकडेवारी ते मांडत आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे अग्रलेखांतून आग्रहाने प्रतिपादन करीत. टिळकांच्या सूचनेवरून भारतातून इंग्लडमध्ये जाणा-या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देण्याची योजना वर्मा यांनी सुरू केली. टिळकांनी योग्य तरुणांची शिफारस करावयाची असे ठरले.


सावरकरांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लडमध्ये जावयाचे होते, तेव्हा टिळकांच्या शिफारशीमुळे वर्मा यांनी सावरकरांना शिष्यवृत्ती दिली आणि इंडिया हाऊसमध्ये राहण्याची सोय केली. इंग्लंडमध्ये आणि युरोपातील देशांतही भारताच्या राजकीय समस्येची माहिती देण्यासाठी कोणाला तरी पाठवावे, असे टिळकांनी सुचविले. वर्मा यांच्या सहका-यांमध्ये मॅडम कामा या पारशी विदुषी होत्या. त्यांनी पूर्वी दादाभाई नौरोजी यांचे सचिव म्हणून काम केले होते. त्यांनी १९०७ मध्ये जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथील जागतिक समाजवादी परिषदेत स्वतंत्र भारताचा ध्वज फडकविला. मॅडम कामाच्या या कर्तृत्त्वाचे टिळकांना समाधान वाटले.


त्यानंतर त्यांनी अमेरिकेचा दौरा करून भारताची बाजू मांडली. टिळकांचे बंगालच्या फाळणी विरोधी चळवळीतील सहकारी लाला लजपतराय यांनी केलेला अमेरिकेचा दौराही फार महत्त्वाचा होता.


महायुद्ध संपल्यानंतर पॅरिसमध्ये शांतता परिषद भरणार असे जाहीर झाले. फ्रेंच मुत्सद्दी क्लेमेंको हे या परिषदेचे अध्यक्ष होते. टिळकांनी १० मार्च १९१९ ला क्लेमेंको यांना विस्तृत निवेदन पाठविले आणि भारताच्या प्रतिनिधीस शांतता परिषदेस हजर राहण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. ती मागणी मात्र मान्य झाली नाही. जगात शांतता नांदावयाची असेल, तर आशियातील सर्व राष्ट्रांना स्वराज्य उपभोगावयास मिळाले पाहिजे. स्वराज्य मिळाल्यावर हिंदुस्थान जागतिक शांततेसाठी शक्य ते सर्व करील, होमरूल डेप्युटेशनचे एक सदस्य बॅ. वेलकर यांनी पुढील आठवण सांगितली होती. टिळक वेलणकरांना म्हणाले, लेबर पार्टीशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला कारण मला असा विश्वास वाटतो, की आपल्याला स्वराज्य मिळविण्यासाठी लेबर पार्टीचे मोलाचे साह्य होईल. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकमान्य टिळकांचेच सूत्र पुढे चालविले.


टिळकांचा दृष्टीकोन विशाल आणि व्यापक होता. त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांना परदेशामध्ये दौरा करण्यासाठी पन्नास हजार रूपये देऊ केले. टागोर टिळकांना म्हणाले, ''मी राजकीय कार्यकर्ता नाही , मी आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करू शकणार नाही.'' टिळकांनी त्यांना कळविले, ''तुम्ही राजकीय प्रचार करावा, अशी माझी अपेक्षा नाही. तुम्हाला मी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी मानतो. तुमचे काव्य, तुमची भाषणे यातून भारताची जी ओळख जगाला होईल तीच मला फार महत्त्वाची वाटते.''


ब्रिटिश सरकारविरुद्ध भारतात उठाव झाल्यास लष्करी शिक्षण घेतलेल्यांना नेतृत्त्व करता येईल या उद्देशाने भारतीय तरूणांना रशियात तसे शिक्षण घेण्याची संधी मिळेल का याची चाचपणी लोकमान्य टिळकांनी केली होती. तत्कालीन रशियन राजदूतांच्या अहवालांतून याविषयी नोंद आढळते. लोकमान्यांचा हा मनोदय पुढे सिद्धीस गेला नाही कारण खुद्द रशियातच १९०५ मध्ये क्रांती झाली आणि ब्रिटन-रशिया यांमध्ये सहकार्याचे वारे वाहू लागले.


लोकमान्यांचा क्रांतीकारकांशी संबंध असे. अर्थात ते त्यांच्या कार्यात प्रत्यक्ष सामील झाले नाहीत. शस्त्र उचलून स्वराज्य निश्चित मिळेल अशी खात्री झाल्याशिवाय आपण तो मार्ग स्विकारणार नाही, असे ते म्हणत. टिळकांनी त्यावेळी मुंबईत असलेल्या रशियन राजदूताशी संपर्क साधला होता. ही माहिती अगदी प्रथम कै.म.म.दत्तोपंत पोतदार यांनी प्रसिद्ध केली. बडोदे सरकारच्या सैन्यात असलेल्या माधवराव जाधव यांना स्वित्झर्लंडमध्ये लष्करी शिक्षणास पाठविण्याची खटपट लोकमान्यांनी केली. जाधव यांना अमेरिकेतील सैनिक विद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांना तेथे सर्व लष्करी प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच सशस्त्र क्रांतीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आधी शस्त्रांची गरज असल्याची दूरदृष्टी टिळकांकडे होती म्हणूनच त्यांनी नेपाळात बंदुकीचा कारखाना काढला. त्यासाठी काकासाहेब खाडीलकर व वासूकाका जोशी आणि पांडूरंगराव तांबट इंजिनिअर यांना नेपाळमध्ये कौलांच्या कारखान्याच्या नावावर बंदुकीचा कारखाना काढला. हा कारखाना तीन वर्षे चालला नंतर त्याचे बिंग फुटले.


डॉ. खानखोजे हे सुदधा टिळकांच्या प्रोत्साहनाने परदेशी गेले होते. तेही जपानमार्गे अमेरिकेस मुख्यतः युद्धशास्त्र शिकण्यासाठी गेले. जागतिक स्तरावरील वजन लक्षात घेता भारतीयांच्या प्रश्नाची जगाला मु्ख्यत्त्वे इंग्लडमधील ब्रिटीश सरकारला जाण करून देणारे लोकमान्य टिळकच होते.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम

हैद्राबाद मुक्तिसंग्राम भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचे पर्व



निजामाच्या असफिया घराण्याची राजवट 1724 ते 1948 पर्यंत सुमारे सव्वा दोनशे वर्षे होती. मीर उस्मान अलीखान बहादूर हे असफिया घराण्याचे सातवे राजे, त्यांची महत्वाकांक्षा मोठी होती. तरी पण ते कोणावर फारसा विश्वास ठेवीत नसत. पण भारतात महत्वाच्या ठिकाणी मुस्लिम सत्तेचे अधिराज्य असावे असे त्यांना वाटत होते. त्यांचे या प्रकारचे प्रयत्नही होते, पण या प्रयत्नांना ब्रिटीश गव्हर्नरांच्या नियंत्रणामुळे खो बसत होता. निजामाची भूमिका सदैव तडजोडीची राहिली आहे. हेतू साध्य करण्यासाठी तडजोड करायची व संधी मिळताच प्रयत्नशील रहावयाचे असा निजामाचा स्वभाव होता. मुस्लिम प्रजा सोडली तर अन्य प्रजा निजामाच्या धोरणाविरूद्ध होती.
हैद्राबाद राज्याचे एकूण 16 जिल्हे होते. त्यात आंध्राचे 8, मराठवाड्याचे 5 व कर्नाटकाचे 3 जिल्हे होते. असे तेलगू, मराठी व कानडी भाषिक नागरिकांचे हैद्राबाद संस्थान होते. नागरिकांच्या मातृभाषेला दुय्यम स्थान होते. राज्याची मुख्य भाषा म्हणून उर्दूला स्थान होते. सरकारी माध्यम उर्दू होते. त्यामुळे उर्दू हीच राज्याची भाषा सक्तीची होती. सर्व व्यवहार उर्दू माध्यमाद्वारे होत. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत उर्दू माध्यमाद्वारे शिक्षण घ्यावे लागत असे. हैद्राबाद संस्थान हे मुस्लिम राष्ट्र व्हावे म्हणून निजामाने भारतातील अरबी, फारशी भाषेच्या विद्वानांना बोलावून त्यांच्या प्रमुख जागी नियुक्त्या केल्या.
हैद्राबादसंस्थानची 85 टक्के प्रजा हिंदू व 15 टक्के मुस्लिम जमातीचे नागरिक होते. राजा मुस्लिम असल्याने शासकीय नोकरीतून 83 टक्के लोक मुस्लिम व 11 टक्के लोक हिंदू व तत्सम लोक शासकीय नोकरीत असत. पण शासनाच्या सर्व खात्यातून अधिकारी वर्ग मुस्लिम असे त्यामुळे हैद्राबाद संस्थानातील हिंदूंना केवळ सामान्य जीवन जगावे लागत होते.

निजामाची राक्षसी महत्वाकांक्षा

निजामाचे धोरण हे दक्षिण भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संस्थानात पाकिस्तानप्रमाणेच मुस्लिम राष्ट्र निर्माण करावे अशी त्यांची राक्षसी महत्वाकांक्षा होती. त्यामुळे बहुसंख्य हिंदू प्रजेला दाबून ठेवण्यासाठी निर्बंध लादण्यात आले होते.
निजामाच्या काळात हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसवर वेळोवेळी बंदी घालण्यात आली. त्यामुळे निरनिराळी नावे धारण करुन कार्यकर्त्यांना संघटनेचे कार्य चालू ठेवावे लागे. त्या दृष्टीने आंध्र परिषद, कर्नाटक परिषद व महाराष्ट्र परिषद या नावे कार्य करावे लागे.
राजकीय निर्बधांसोबतच धार्मिक निर्बंध मोठ्या प्रमाणात लादले होते. कोणत्याही धार्मिक कार्यासाठी परवानगी घ्यावी लागे. कोणत्याही ठिकाणच्या मशिदीपुढून कोणत्याही वेळी वाद्य वाजवीत जाता येत नसे. पालखी, दिंडी सारख्या मिरवणुकीवर हल्ले केले जात. अधिकारी मुस्लिमधार्जिणे असल्याने रझाकारांना साथ मिळत असे व अर्जदारांना अन्यायाने शिक्षा भोगावी लागे. या निर्बंधांचा बिमोड करण्यासाठी आर्य समाजाने 1936 साली फार मोठी चळवळ उभी केली. धार्मिकदृष्ट्या हिंदूंवर लादलेली बंधने काढून टाकावीत म्हणून सत्याग्रहाचा अवलंब केला.
आर्य समाजाने सोलापूर व अहमदनगर येथे केंद्र चालू केले होते. या दोन्ही ठिकाणी सत्याग्रहींची नोंदणी करुन ते गुलबर्गा व हैद्राबाद आदि ठिकाणी जावून सत्याग्रह करुन अटक करुन घेत. आर्य समाजाचे कार्यकर्ते पं.नरेंद्रजी, पं. बन्सीलालजी व हुतात्मा श्यामलालजी हे दोघे बंधु, बॅ.विनायकराव विद्यालंकार, ऍड. गोपाळराव एकबोटे, महात्मा आनंद स्वामी या कार्यकर्त्यांनी स्फूर्ती दिल्यामुळे हैद्राबाद संस्थानातील प्रत्येक जिल्ह्यातील तुरुंग सत्यागृहींनी भरले होते. हे कार्यकर्ते तुरुंगात होमहवन करीत व संघटना बलवान व्हावी म्हणून चर्चासत्रे घडवून आणीत. सत्यार्थप्रकाश या ग्रंथाचे अध्ययन करीत. धर्मवीर श्यामलालजी यांचा तुरुंगात मृत्यु झाला.
हिंदूंनी जाती-पाती पाळू नयेत, रोटी-बेटी व्यवहार करावेत, सर्व मानव जात एक आहे, उच्च-नीचता मानू नये असा उपदेश केला जात असे. समाजाच्या दुर्बल घटकातील कार्यकर्त्यांना संघटीत करुन प्रवाहात आणण्याचे कार्य आर्य समजाने मोठ्या प्रमाणात केले आहे.
अखिल भारतीय कॉंग्रेसचे कार्य मोठ्या प्रमाणात देशात चालू होते. कारण कॉंग्रेसचा लढा संपूर्ण राष्ट्राच्या मुक्ततेचा होता. हैद्राबाद संस्थानातील प्रजेला फक्त मिठाचा सत्याग्रह तेवढा करता आला नाही. कारण संस्थानासाठी समुद्र किनाराच नव्हता. मात्र अ.भा. कॉंग्रेसच्या आदेशानुसा रशिंदीची, ताडीची, मोहाची झाडे तोडून जंगल सत्याग्रह असंख्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला. ताडीच्या झाडापासून निजामाला मुबलक प्रमाणात उत्पन्न मिळत होते. महात्मा गांधींनी दिलेल्या असहकाराच्या चळवळीत खादीचा प्रचार, सूतकताई, मातृभाषेतून शिक्षण, राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार, राष्ट्रीय विचाराच्या शाळा सुरु करणे, दुर्बल घटकातील कार्यकर्त्यांना संघटनेत वाव देवून अस्पृश्योद्धाराची चळवळ पुढे नेणे आदि कार्यक्रम कॉंग्रेस संघटनेच्यावतीने केले जात असत.
1942 साली महात्मा गांधींनी ब्रिटीशांना 'चले जाव'ची घोषणा करताच मराठवाड्यातील स्टेट कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करुन तुरुंगवास भोगला.
हैद्राबाद संस्थानात वंदे मातरम्‌वर बंदी घालण्यात आली होती. शाळेत वंदे मातरम्‌ हे गीत म्हणू दिले जात नसे. वंदे मातरम्‌ सत्याग्रहाचा श्री गणेशा औरंगाबाद येथे झाला. ही चळवळ मराठवाड्याच्या प्रत्येक शहरात पोचली. महाविद्यालयाच्या व उस्मानिया विद्यापीठाच्या परिसरात वंदे मातरम्‌ म्हणायचे नाही. याबाबत खूप संघर्ष झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाशीम, वर्धा, नागपूर, जबलपूर येथील महाविद्यालयातून प्रवेश घेतला व शिक्षण पूर्ण करावे लागले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सर्वश्री गोविंदभाई श्रॉफ, आ.कृ. वाघमारे, एस.के. वैशंपायन व रावसाहेब पटवर्धन यांनी केले.

महाराष्ट्र परिषदेचे उल्लेखनीय कार्य

निजामानेहैद्राबाद स्टेट कॉंग्रेसवर बंदी घातल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परिषदेच्या नावाखाली मराठवाड्यात चळवळ चालू ठेवली. मराठवाड्यातील कॉंग्रेस संघटनेकडे पूर्ण वेळ काम करणारे 83 कार्यकर्ते होते. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 22, परभणीत 16, नांदेड 16, बीड 7, उस्मानाबाद 13 व हैद्राबाद- सिकिंद्राबाद या ठिकाणी मराठवाड्यातील 9 कार्यकर्ते संघटनेचे काम करीत असत.
औरंगाबादेत सर्वश्री लाला बिंदा प्रसाद, मनोहरराव लोनदे, भालचंद्र व्यसाहाळकर, वि.रा.जोशी, बद्रीनारायण बारबोले, काशीनाथ कुलकर्णी, नाना जेधे, द्वारकादास पटेल आदी.
परभणी - सर्वश्री गणपतराव चारठाणकर, विनायकराव चारठाणकर, प्रभाकर वाईकर, दिगंबरराव कुलकर्णी, भुजंगराव जैन, किशनराव सवनेकर, श्रीनिवासराव बोरीक, मुकुंदराव पेडगांवकर आदी.
नांदेड- अनंतराव भालेराव, सीताराम पप्पू, रघुनाथ रांजणीकर, लक्ष्मण पाटील, नागनाथ परांजपे, मुंजाप्पा जंगम, शंकरसिंग कुबेर, गंगाराम बेळगे, श्यामरावबोधनकर, गोपाळ शास्त्रीदेव, भगवानराव गांजवे.
बीड - काशीनाथ जाधव, रतनलाल कोटेचा, श्रीनिवास खोत, दिगंबर दिघे, भिकाभाऊ राखे, वसंत देशपांडे आदी.
उस्मानाबाद- रा.श्री. दिवाण, कॅ. व्यं.बा. जोशी, विश्र्वंभरराव हराळकर, देवसिंह चौहाण, बाबुराव कानडे, श्रीनिवास अहंकारी, नरहराव मालखरे, चंद्रशेखर बाजपाई, नारायणराव चाकूरकर, बळवंत नागणे, फूलचंद गांधी, विमलचंद गांधी आदी.
हैद्राबाद- सिकिंद्राबाद या संघटनात्मक कार्याच्या जिल्ह्यातून सर्वश्री एस.के.वैशंपायन, ज.रा. बर्दापूरकर, श्यामराव अपसिंगेकर, पु.गो. पार्डीकर, दामोदरपांगरीकर, मा.रा. परांजपे, प्रतिभा वैशंपायन, माधवराव पाठक आदि कार्यकर्ते काम करीत आहेत.

भारत स्वतंत्र झाला आणि निजामाची महत्वकांक्षा वाढली

15ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. जागतिक दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना दोस्त राष्ट्रांच्या मदतीने विजय मिळाला पण ब्रिटनची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. ब्रिटिशांचा अंमल ज्या राष्ट्रावर होता त्या राष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळी चालू होत्या. आशिया खंडात भारत हे सर्वात मोठे राष्ट्र. भारताला स्वातंत्र्य देत असतानाच ब्रिटिशांनी भारताचे हिंदूस्थान व पाकिस्तान असे विभाजन केले होते. विभाजनामुळे कत्तली झाल्या. निर्वासीतांचे लोंढे भारतात येऊ लागले. भीषण परिस्थिती निर्माण झाली.
पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी लेखणीच्या फटकाऱ्यानिशी भारतातील छोटी, मोठी संस्थान भारतात विलीन करुन टाकली. सर्वात मोठे संस्थान हैद्राबादच्या निजामाचे होते. निजामाने राक्षसी महत्वाकांक्षेपोटी इत्तेहादुल मुसलमीन या जातीय संस्थेच्या आधारे रझाकारांची संघटना सुरु केली होती. लातूरच्या कासिम रझवीने इत्तेहादुल मुसलमीन या संस्थेवर ताबा मिळविला व रझवी प्रमुख बनले.
रझाकार संघटनेने प्रजेवर जुलूम, जबरदस्ती, धाक, दपटशा, स्त्रियांवर अत्याचार करणे, खंडणी वसूल करणे, रझाकारांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे खून करणे आदि कामे सुरु केल्याने हैद्राबाद संस्थानात दहशतीचे वातावरण सुरु झाले होते. स्टेट कॉंग्रेसच्या नेत्यांना अटक करुन तुरुंगात टाकण्यात येत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले पण निजामी राज्य राक्षसी महत्वाकांक्षेने चेकाळले.
16,17 व 18 जून 1947 ला स्टेट कॉंग्रेसचे पहिलेच अधिवेशन होणार होते. यात अधिवेशनासाठी बाहेरून येणाऱ्या पुढाऱ्यांची भडक भाषणे होऊ द्यायची नाहीत असे निर्बंध घालण्यात आले होते. या अधिवेशनात स्वामी रामानंद तीर्थ यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात ''हैद्राबाद सरकारने स्वतंत्र हिंदूस्थानात विलीन व्हावे व सर्व प्रकारचे नागरिक स्वातंत्र्य प्रजेला बहाल करावे. अन्यथा प्रजा क्रांतीचा अवलंब केल्याशिवाय राहणार नाही'', असे रोखठोक सांगितले.
स्टेट कॉंग्रेसच्या अधिवेशनानंतर दडपशाही सुरु झाली. दडपशाहीची सुरुवात होणार याची जाणीव असल्याने व स्वामीजींनी आदेश दिल्यावरून काही कार्यकर्त्यांनी सत्याग्रहाचा व काहींनी भूमिगत राहून कार्य करण्याचा मार्ग स्विकारला.

प्रत्यक्ष संग्रामाची सुरुवात - सरहद्दीवर सशस्त्र लढा

नांदेड जिल्ह्याचे उमरखेड, लोणी, धानोरा आणि शिवालपिंपरी येथे कॅंप्स सुरु झाले. बीडच्या कार्यकर्त्यांनी खेर्डा, पाथर्डी, डोंगर किन्ही, बालम टाकळी, मिरजगांव आणि कडा भागात होते. उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर खेरीज बार्शी,गौंडगाव, चिंचोली, वाघोली, आंबेजवळगा,कौडगांव, वागदरी, मुश्ती या ठिकाणी कॅंप्स उघडले.
मराठवाडा विभागाचे स्टेट कॉंग्रेसचे केंद्र कार्यालय मुंबई येथे व प्रांतिक कार्यालय मनमाड येथे होते. औरंगाबाद जिल्ह्याचे कॅंप्स देऊळगांव राजा, साडेगांव, कोलता टाकळी, वातोडा, शेंदूर्णी, सुरगांव, एरंडगाव, भंगलगांव आणि टोका एवढ्या ठिकठिकाणी होते.
कॅंप्समधील युवक कार्यकर्त्यांनी संस्थानात राज्यकारभार हाकणे कठीण करावे, रझाकार आणि पोलीसांच्या अत्याचारांना पायबंद घालावा, करोडगिरीच्या नाक्यावर हल्ले करावेत व संस्थानात असलेल्या जनतेचे धैर्य खचू देऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले होते. उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, जिल्ह्यात करोडगिरीच्यानाक्यावर, पोलीस स्टेशनवर रझाकारांच्या केंद्रावर हल्ले करण्यात आले.
आंदोलक कार्यकर्त्यांनी वाहतूक खंडित करणे, रेल्वेच्या रुळावरून मालगाडीचे डबे पाडणे, रेल्वेरुळ उखडणे अशी कामे केली. आंदोलनाचे प्रथम पर्व कायदेभंग होते. त्यात 1046 खेड्यात सामुदाईक झेंडावंदन घेण्यात आले. 1,22,000 शिंदी, ताडी व मोहाची झाडे तोडण्यात आली. 5588 लोकांना अटक करण्यात आले होते. 550 खेड्यांनी तस्करी कर देण्यास नकार दिला. 270 खेड्यांनी लेव्ही देण्यास नकार दिला. 182 करोडगिरी नाकी उद्‌ध्वस्त करण्यात आली. 47 पोलीस ठाण्यावर हल्ले करण्यात आले. 165 खेड्यांनी पोलीस व रझाकारांचा प्रतिकार केला. 844 शत्रू ठार केले. 250 खेड्यांनी निजामी सत्ता झुगारुन स्वातंत्र्य पुकारले. लढत असताना स्टेट कॉंग्रेसचे 17 सैनिक धारातीर्थी पडले. शत्रूच्या अमानुष गोळीबारात 30 जण बळी पडले.

सोलापूर येथे बॉंब कारखाना

पू.बाबासाहेब परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे बॉंबचा कारखाना सुरु करण्यात आला. बी.बी. नागणे व विनयाकराव महाजन यांनी लातूर व औसा येथील युवकांना हाताशी धरून बॉंब तयार करण्याचे काम केले. या कारखान्यात तयार केलेले बॉंब मराठवाड्याच्या बाहेर सरहद्दीवर असलेल्या सर्व कॅंप्सना पुरविले जाऊ लागले. शिवाय मनमाड, पुणे, इंदौर, बेंगलोर, जबलपूरहून हत्यारे मिळत, ती आणून कॅंप्सवर पोचविली जात.
उस्मानाबाद जिल्ह्यात पू. बाबासाहेब परांजपे, फूलचंद गांधी, विमलचंद गांधी, रा.श्री.दिवाण, चंद्रशेखर बाजपाई, शेषराव वाघमारे, विश्वंभरराव हराळकर यांनी यशस्वीपणे लढा दिला. याच काळात उमरी जि. नांदेड येथील सरकारी बॅंकेवर नियोजीत हल्ला करुन कार्यकर्त्यांनी 20 लाख 63 हजार 719 रुपये 15 आणे अशी निजामी रक्कम लुटली व ती बैलगाड्यांतून मध्यप्रदेशात व त्यानंतर सोलापूर येथे आणण्यात आली. या सर्व रक्कमेचा हिशेब भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभाभाई पटेल यांना देण्यात आला आहे.
याआंदोलनात महिलाही आघाडीवर होत्या. लातूरच्या सुशिलाबाई दिवाण, बीडच्या पानकुंवर कोटेचा, जालन्याच्या माई अंबेडकर, सरस्वतीबाई बोरीकर, चंदाबाई जरीवाला, राजकुंवर काबरा, तुंगा बेलुलीकर, गीताबाई चारठाणकर, कुसुम जोशी, शांताबाई पेडगांवकर, दगडाबाई शेळके, शकुंतला चाकूरकर या महिला आघाडीवर होत्या. आंदोलनातील गोवर्धन सराळ्याचे 8 खेड्याचे राज्य समाजवादी कार्यकर्ते विजयेंद्र काबरा व त्यांच्या पत्नी राजकुंवर काबरा यांनी निर्माण केले होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील स्टेट कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मानेगाव व जांबगांव या दरम्यानच्या पट्यातील 65 गावे स्वतंत्र करुन पोलीस ऍक्शन पर्यंत ताब्यात ठेवली होती. या गावांचे मुक्तापूर असे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात आले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी या पट्यात राष्ट्रध्वज उभारून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या भागात कै. व्यं.बा. जोशी, चंद्रशेखर बाजपाई, राजेंद्रदेशमुख, शेषराव वाघमारे, नरहरराव मालखरे, नानासाहेब चिंचोलीकर, वसंत देशमुख यांचे कारभारी मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यांना भगवान तोडकरी, रामभाऊ जाधव, रामचंद्रजी मंत्री, विठ्ठलराव पाटील, एल.बी. जठ्ठेगुरुजी आणि गोपाळदेव यांचे सहाय्य देण्यात आले होते.

पोलीस कारवाई

निजामाशी राजकीय वाटाघाटी केल्या जात होत्या. गृहमंत्री सरदार पटेलांनी सर्व प्रकारचे उपाय सुचवूनही निजामाचा स्वायत्तेचा हट्ट कमी होत नव्हता. देशातील सर्व संस्थानिकांनी आपली संस्थाने भारतात विलीन करुन सर्व नागरिक समान मानले होते. जबाबदार राज्य पद्धतीचे धोरण स्विकारले होते. पण निजामाचे व दक्षिण भारताच्या मध्यवर्ती भागात मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न कमी होत नव्हते. निजाम आणि त्यांना साथ देणारी इत्तेहादूल मुसलमीन व रझाकारांचे प्रमुख कासिम रझवी हे अत्याचार वाढवीत होते.
सरहद्दीवरील स्टेट कॉंग्रेसच्या सैनिकांनी सशस्त्रे लढे देवून 274 खेड्यांचा भूभाग ताब्यात घेवून निजामी राजवटीला हादरा दिला होता. जागतिक परिस्थिती निजामाला अनुकूल नव्हती. या संधीचा लाभ घेवून भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद संस्थानाच्या चारही दिशातून पोलीस कार्यवाही केली. 13 सप्टेबर 1948 रोजी पोलीस कार्यवाहीला सुरुवात झाली. सोलापूरहून मेजर जनरल जे.एन. चौधरींच्या मार्गदर्शनाखाली निजामी हद्दीत सैन्य घुसले व 17 सप्टेंबर 1948 रोजी सर्वप्रथम जे.एन. चौधरी सैन्यानिशी हैद्राबादला पोचले. निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद संस्थान मुक्त झाले.
भारतातील सर्व संस्थाने विलीन झाली असताना निजामाचे एकमेव हैद्राबाद संस्थान विलीन झाले नव्हते. स्टेट कॉंग्रेसच्या सशस्त्र लढ्याने व भारत शासनाने पोलीस कार्यवाही केल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचे अपूर्ण असलेले पर्व पूर्ण झाले.
हैद्राबाद मुक्ती संग्रामाला आता 62 वर्षे पूर्ण झाली. भारतीय घटनेनुसार आम्ही लोकशाही, जबाबदार, धर्मनिरपेक्ष राज्य पद्धतीचा अवलंब करुन जीवन जगत आहोत. भारतीय घटनेने सर्वांना मतदानाचे अधिकार दिले आहेत. प्रत्येकाला मूलभूत अधिकरानुसार जगण्याचा व अडथळा आल्यास न्याय पद्धतीचा अवलंब करण्याचा अधिकार दिला आहे. तेंव्हा हे भारतीय राष्ट्र आर्थिकदृष्ट्या संपन्न कसे होईल हे पाहण्याची गरज आहे. त्यासाठी संघटना बांधणे, संघर्ष करणे व ग्रामीण भागापासून राज्यापर्यंत श्रमदान करुन राष्ट्र अधिक बलवान कसे होईल हे पाहण्याची गरज आहे.












जीवनधर शहरकर, लातूर

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

सहवास पर्व सुरू - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग १३)


नियती महापुरुषांना उदंड गुणवत्तेचे वरदान देते. त्याच वेळी त्यांचे आयुर्मान हिरावून घेते. विवेकानंदांच्या बाबतीत तेच घडले. उभ्या भारताची यात्रा करणारे, दोन वेळा अमेरिकेत जाऊन येणारे, युरोपचा काही भाग पाहणारे, ब्रिटिशांच्या राजधानीत आपल्या भाषाप्रभुत्वाने आणि ज्ञानविज्ञान संपन्नतेने अनेकांना प्रभावित करणारे, भगिनी निवेदितांसारख्या प्रज्ञासंपन्न सुकन्यांचा भक्तिभाव संपादन करणारे विवेकानंद केवळ चाळीस वषेर् भूतलावर राहिले. त्यातले काही दिवस कालपुरुषाने हिरावून घेतले.

विवेकानंदांना लहानपणापासून मधुमेहाचा विकार होता. त्या काळी हा विकार रोखण्याचे प्रभावी मार्ग जगाला माहीत नव्हते. विवेकानंद उत्तम खेळाडू होते. सुदृढ बांध्याचे होते. शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यांच्या भाषाज्ञानाचे कौतुक होत असे. संस्कृत, इंग्रजी, बंगाली, पशिर्यन, फ्रेंच अशा विविध भाषांतून ते विचारविनिमय आणि सहज संवाद करीत.


त्यांना मनातून परमेश्वराची ओढ वाटत असे. पण जगाच्या रचनेत अनेक त्रुटी ठेवणारा परमेश्वर असे का करतो याचे कोडे पडत होते. कधी कधी ते म्हणत : ''स्वर्गात सिंहासन देणारा; पण भूतलावर भाकरीची भ्रांत पाडणारा लहरी देव मला मान्य नाही.''


त्यांचे मन हे एक कुरुक्षेत्र झाले होते. अनेक परस्परविरोधी विचारांचे संगर तेथे चालत असे. त्यांनी विवाह टाळला. संसार हा विचार सोडला. नोकरी, व्यवसाय, दव्यलाभ यांचे गणित मांडले नाही. ते जीवनाचे पूर्ण वेळ अभ्यासक व उपासक म्हणून जगले. जीवनाची अर्थपूर्णता ज्यावर अवलंबून आहे अशा परमतत्त्वांचे चिंतन, संशोधन केले. त्यासाठी पातंजल योग अभ्यासला. गुरूचा शोध घेतला आणि शेवटी ते रामकृष्णांच्या चरणी थांबले.


रामकृष्णांना विदेही स्थितीत विवेकानंदांचे पूर्वजन्म आणि भविष्यकालीन कार्य यांचे आकलन घडले. ते त्यांनी आपल्या मनात ठेवले. विवेकानंदांना अधिकारी मार्गदर्शक हवा होता. रामकृष्णांना आपल्या साधनेची गाथा ज्याला समजावून द्यावी असा अधिकारी शिष्य हवा होता. नियतीने ही गाठभेट घडवून आणली.


रामकृष्णांचा साधनाकाल संपला आणि त्यांना सिद्धावस्था प्राप्त झाली. या अवस्थेत कोलकात्यातील अनेक विद्वान, अधिकारी, समाजपुरुष त्यांच्याकडे आकृष्ट झाले.


विवेकानंदांना ओळखणारे सुरेंदनाथ मित्र, रामचंद दत्त, व्रजेंदनाथ सील असे काही सांगाती होते. त्यांनी त्यांना सांगितले की, ''तू शेलीच्या कविता वाच. रामकृष्णांना भेट.'' प्राचार्य हेस्टी यांनी पण तेच सुचविले.


विवेकानंदांचे आजोबा पारमाथिर्क होते. आई भाविक होती. वडील मात्र रसिक, विद्वान पण अज्ञेयवादी होते. परमेश्वर हा त्यांच्या लेखी एक गौण आणि अर्थशून्य विषय होता. त्यांना पशिर्यन काव्य फार आवडे. त्यांच्या दिवाणखान्यात रसिकांची आणि पंडितांची सभा भरे. या सभेत बाल नरेन्दाला आनंदाने आणि अगदी बरोबरीने सामावून घेतले जात असे.


आई रामायण महाभारताचे वाचन करीत असे. तशी ती व्रतस्थ होती. विवेकानंदांच्या जन्मापूवीर् तिने काशीच्या विश्वेश्वराला नवस केला होता. त्याला एक लक्ष बिल्वदले वाहण्याची प्रतिज्ञा केली होती. विवेकानंदांचा जन्म झाला आणि आईने असे गृहीत धरले का आपला सुपुत्र हा शिवाचा अंशावतार आहे. मुलाचा व्रात्यपणा असह्य झाला म्हणजे रागाने म्हणत असे : शिवाला मी पुत्र मागितला आणि त्याने हा रुद धाडला.


अशा अपवादभूत आणि विलक्षण मुलाला वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले. विवेकानंदांचे शिक्षण वारंवार खंडित झाले. प्रगती पुस्तकात गुणसंख्येची झगमग कधी दिसली नाही. ते बी. ए. ची परीक्षा द्वितीय श्ाेणीत उत्तीर्ण झाले. तथाकथित गुणवत्ता यादीची तमा त्यांनी बाळगली नाही. पूवीर् हे शैक्षणिक वेड विकोपाला गेले नव्हते.


विवेकानंदांना ऑफिसर, वकील, डॉक्टर, इंजिनिअर असे काहीच व्हावयाचे नव्हते. त्यांना कृतार्थ आणि अर्थपूर्ण जीवन तपस्यापूर्वक जगावयाचे होते. जीवनाची महत्ता आणि अर्थपूर्णता ज्यावर अवलंबून आहे अशा तत्त्वांचा शोध आणि बोध हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासाने त्यांना रानोमाळ फिरवले आणि रामकृष्णांच्या पुढे उभे केले. या दोन व्यक्तिमत्त्वांची युती हा एक विलक्षण योग होता. दोघांच्या दर्शनी रूपात आणि जीवनशैलीत फरक होता.


रामकृष्णांची शाळा सुरुवातीलाच सुटली होती. ते बोलताना अडखळत. त्यांची अंगकाठी बेताची होती. ते समाजात फारसे फिरले, वावरले नव्हते. दक्षिणेश्वर आणि कोलकाता आणि त्यांचे जन्मगाव कामारपुकूर या परिघात ते राहिले, वावरले. एखादी तीर्थयात्रा एवढाच काय तो अपवाद! या उलट विवेकानंद हे राजबिंडे, रुबाबदार, व्यासंगी, वक्तृत्वसंपन्न, क्षात्रतेजाने तळपणारे, दिग्विजयी आणि विश्वसंचारी होते.


विवेकानंद हे कोणाची तमा बाळगणारे, कोणापुढे नमणारे किंवा कशानेही दीपून अथवा भारावून जाणारे नव्हते. रामकृष्णांकडे कोलकात्त्यातील मान्यवर आणि महाज्ञानी जात असत. यामुळे विवेकानंदांना त्यांचे कौतुक वाटे, त्यांच्याविषयी कुतूहल वाटे. अनेक वर्षांच्या सावध सहवासातून, अगदी तावून सुलाखून घेतल्यावर त्यांनी हे जाणले की ''पूवीर् जो राम झाला, कृष्ण झाला तोच हा रामकृष्ण.''


रामकृष्ण-विवेकानंद यांचे सहवासपर्व, संवादपर्व हे एक परमार्थ रामायण ठरले.


या रामायणात संस्कृतीचे सार आहे. सर्व धर्मांचा आशय आहे. ज्ञानविज्ञानाचा प्रकाश आहे. भगवान बुद्धांची करुणा आहे. शंकराचार्यांचा विवेक आहे. सॉक्रेटिसाचा संवाद आहे. जे-जे अर्थपूर्ण ते सर्व आहे. प्रगल्भ मनुष्यत्व आणि पारमाथिर्क दिव्यत्व यांचा प्रकाश आहे. चंदाच्या दिशेने झेप घेणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मनातील विकल्प दूर करण्याची शक्ती आहे. निरासक्त संन्यस्तांची मानसिक श्रीमंती दुरिताचे तिमिर घालवू शकेल असा गाढ विश्वास आहे.

( क्रमश:)


- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

खरा धर्म - प्राचार्य शिवाजीराव भोसले ( भाग १२ )


जगाच्या इतिहासात अनेक शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, देशभक्त, समाजसुधारक झाले. अनेक मुत्सद्दी व राजकारणी झाले व होतील. पण 'विवेकी संन्यासांचे आणि विश्वधर्माच्या उपासकांचे असे घराणे कोठे आढळणार नाही. सत्तेच्या राजकारणापासून कटाक्षाने दूर राहणे, जात, प्रांत, पक्ष, धर्म या अभिनिवेशांपासून मन मुक्त ठेवणे, ध्यानधारणा व समाजसेवा यांचा समन्वय साधणे, व्यक्तिगत संसार ही कल्पना मनावेगळी करणे, निर्मळ चरित्र व निष्कलंक ब्रह्माचर्य ही दैवी गुणसंपदा जपणे, स्त्रियांचे संघ, मठ व कार्यपद्धती स्वतंत्रपणे सांभाळणे, सूर्यास्तानंतर स्त्रियांच्या साधनेत व कार्यात व्यत्यय न आणणे अशा काही व्रतांचे पालन हे साधक करतात. सिनेमा, नाटक, टी.व्ही. याऐवजी ध्यान आणि उपासना यांचा अवलंब करतात. रात्रीचे भोजन किंवा पाटीर् हा प्रकार कोठे अनुसरला जात नाही. खेड्यापाड्यातून, गिरीकंदरातून औषधोपचाराची जमेल तेवढी सोय केली जाते. कोयना व किल्लारी भागांत घडलेल्या भूकंपाच्या वेळी रामकृष्ण संघाचे साधू सार्वजनिक संस्था आणि कार्यकतेर् यांच्याबरोबर कार्यरत राहिले. स्वामीजी एकदा म्हणाले होते : या देशात एक कुत्रा उपाशी आहे, तोपर्यंत आमचे सेवाकार्य चालतच राहणार. आमचा धर्म सेवापरायण आहे. ज्ञान, ध्यान व समाजसेवा यात कसलाही विरोध संभवू शकत नाही. व्यक्ती आणि समाज यांची उन्नती आणि उत्कर्ष, त्यांचे स्वास्थ्य व आरोग्य यांचा विचार सोडून मिटल्या डोळ्यांनी ध्यान करणे हा धर्म नव्हे. मठाधिपतींची मिरास व मंदिरातील आरास हा पोकळ डौल आहे. तो धर्मदोह आहे.

विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व संपन्न होते. त्याला अनेक पैलू होते. त्यांच्या प्रतिक्रिया संदर्भसापेक्ष होत्या. ते स्वत: घडले, वाढले त्यामागे अनेक शक्ती होत्या. त्यातल्या काही अंगभूत होत्या. काही आनुवंशिक होत्या तर काही परिस्थितीसापेक्ष होत्या.


ते शिकागोला गेले नसते, अमेरिकेत फिरले नसते, इंग्लंडमध्ये राहिले नसते तर एवढे प्रसिद्धीचे वलय त्यांना प्राप्त झाले नसते.


असामान्य भाषा प्रभुत्व, तेजस्वी व्यक्तिमत्त्व, उदंड व्यासंग या बाबी वजा केल्या तर केवळ गुरुकृपेला अर्थ प्राप्त झाला नसता.


विवेकानंदांच्या विचारांचा खरा अभ्यास त्यांच्या हयातीत पूर्णत्वाने घडला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वलय आणि वर्तमानपत्रातील बातम्या यामुळे ते समकालीनापुढे तळपत राहिले.


मात्र त्यांची जीवनयात्रा संपल्यावर त्यांचे साहित्य अधिक प्रकाशात आले. त्यांच्या गुरुबंधूंनी व अन्य शिष्यांनी काही खंडांत त्याची बांधणी केली. सुमारे साडेचार हजार पृष्ठांत विस्तारलेले विचारधन ही कौतुकाची बाब आहे. त्यांच्या समग्र साहित्याच्या विविध भाषांतून प्रसिद्ध झालेल्या अनुवादित आवृत्ती आज सावकाशीने अभ्यासणे शक्य आहे.


विवेकानंदांच्या वाट्याला भ्रमंती फार आली. त्यामुळे त्यांना लेखनाची बैठक घालून आवर्जून आणि अहोरात्र लेखन करता आले नसावे.

पण त्यांचे शब्द कानामनाने टिपणारे व लगोलग त्याला लिखित रूप देणारे तत्पर शिष्य आणि शिष्या त्यांना भेटल्या हे भारतीयांचे भाग्य! स्वामींनी विपुल पत्रलेखन केले, ते आपल्या हस्ताक्षरात.

1893 ते 1897 या त्यांच्या तिकडच्या वास्तव्य काळात टेप किंवा व्हिडिओ रेकॉडिर्ंग उपलब्ध नसल्यामुळे स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्व यांचे परिपूर्ण चित्रण घडू शकले नाही. पण जो अंश वाट्याला आला त्याला पूर्णत्वाचा गंध प्राप्त झाला आहे.

( क्रमश:)


- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

रामकृष्ण दर्शन - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग ११ )


विवेकानंद रामकृष्णांकडे जाऊ लागले. कधी साशंक मनाने तर कधी नि:शंक वृत्तीने ते त्यांच्याशी बोलत. त्यांना देव हवा होता. रामकृष्णांनी तो अनुभवला होता. स्वामींना समाधिसुख हवे होते. रामकृष्ण सतत त्याच अवस्थेत असत. शेवटी रामकृष्ण हे विवेकानंदांच्या जीवनातले एकमेव आशास्थान उरले. रामकृष्णांच्या कृपेने आपणास देवदर्शन घडेल, साक्षात्कारसुख लाभेल असे त्यांना वाटे. काही वेळा हा आशावाद फोल वाटे. या जगात कोण कोणाला काय देऊ शकेल? धनसंपदा देता येईल. ज्ञानही थोडेफार देता येईल; पण साक्षात ईश्वरानुभव कोण आणि कसा देणार? ही काय देण्याघेण्याची गोष्ट आहे काय? तरी सुमारे पाच-सहा वषेर् मोठ्या आशेने, अपेक्षेने आणि ओढीने विवेकानंद तहानभूक विसरून रामकृष्णांकडे जात होते. जगातले सर्व साधनमार्ग ज्याने चोखाळले होते आणि जो विश्वात्मक झाला असा एक महामानव विवेकानंदांना दिसत होता. त्याच्या नावापुढे पदवी नव्हती. त्याच्या घरी तिजोरी नव्हती. नव्हे ज्याने उभ्या आयुष्यात पैशाला स्पर्श केला नाही. ज्याला विषयसंग घडला नाही. ज्याने लग्न केले आणि पत्नीला देवता मानले असा हा अद्भूत माणूस! जर वेडेच व्हावयाचे, तर या वेड्यापायी वेडे व्हावे, असे स्वामीजींना वाटू लागले. रामकृष्णांचा हा नरेंद अजून स्वामी व्हावयाचा होता. त्याने समचित्त होऊन मानसिक स्वामित्व संपादन केले होते. या आत्मप्रभुत्वाच्या आरशात त्याला रामकृष्णांचे दर्शन घडे. पुढे रामकृष्ण संघाच्या माध्यमातून ज्याचे सादरीकरण घडले ते रामकृष्ण दर्शन विवेकानंदांच्या अंतर्यामी आकाराला येऊ लागले. त्याचे मूलभूत सिद्धांत स्वामींनी शब्दबद्ध केले ते असे. ''डिव्हिनिटी ऑफ सोल' आणि 'युनिटी ऑफ एक्झिस्टन्स' , 'हार्मनी ऑफ रिलिजन्स' , 'रिनन्सिएशन अँड सव्हिर्स' .

आपल्या ठायी असणाऱ्या दिव्यत्वाचा शोध आणि बोध, इतरांच्या ठायी येणारा त्याचा प्रत्यय, सर्वधर्मांचा परस्पर संवाद, मोहापासून मुक्ती अथवा विरक्ती, जीवमात्राची शिवभावे सेवा : या तत्त्वांचा समुच्चय म्हणजे रामकृष्ण धर्म!


आदर्श व्यक्ती, समाज आणि जग यांच्या संवर्धनासाठी उपयोगी पडणारी ही आचार-विचारसूत्रे विवेकानंदांना गवसली. इतकेच नव्हे तर त्यांचे सर्व पारमाथिर्क हट्ट रामकृष्णांनी पुरविले. त्यांना देवीचे दर्शन घडविले. समाधीचे सुख मिळवून दिले. विवेकानंद गाभाऱ्यातील देवी मानत नव्हते. ती एक सजलेल्या पाषाणाची आकृती असे ते समजत. पण एकदा कौटुंबिक विवंचनांनी ग्रासलेले व अगतिकतेपोटी खिन्न आणि सुन्न झालेले विवेकानंद रामकृष्णांच्या आज्ञेने देवीला साकडे घालण्यासाठी कालीमंदिरात गेले. देवीच्या प्रत्यक्ष दर्शनाने आपले दु:ख विसरले. त्यांनी हात जोडून याचना केली ती विवंचना मुक्तीची नाही. आथिर्क मदतीची नाही. 'भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य' यांची. त्यांना देवी दिसली. केवळ भासली नाही. काश्मीरच्या क्षीरभवानी मंदिरात, दक्षिणेकडे कन्याकुमारीच्या मंदिरात तिची भिन्न दर्शने घडली.


स्वामींनी पातंजल योग अभ्यासला होता. ते आसनस्थ होत. ध्यानधारणा करीत; पण समाधिसुखाचा लाभ त्यांना घडत नव्हता. रामकृष्णांच्या अखेरच्या आजारात ते जग सोडून जाण्यापूवीर्, काशीपूरच्या उद्यानात स्वामींना सुदीर्घ समाधीसुखाचा अनुभव घेता आला. परब्रह्मा हाताशी आले, अगदी कवेत आले. पण त्याच क्षणी रामकृष्ण म्हणाले : आता हे अनुभवाचे कपाट बंद करून त्याची किल्ली मी माझ्या हाती ठेवतो आहे. तुला या उदात्त आणि उत्तुंग अनुभवाच्या परीघाबाहेर राहून जीवमात्राची सेवा करावी लागेल. तुझे जगणे जगाच्या कल्याणासाठी घडावे असा माझा हट्ट आहे. श्ाी रामकृष्ण थोड्या दिवसांत गळ्यातला कॅन्सर वाढून वाढून हे जग सोडून गेले. जाता जाता म्हणाले : पूवीर् जो राम झाला, कृष्ण झाला तोच मी रामकृष्ण म्हणून वावरलो. देहत्याग घडला तरी मी तुम्हा साधकांबरोबर असेन. विवेकानंद, शारदामणी, आपले विरक्त युवाभक्त असा परिवार मागे ठेवून एका वेगळ्याच रूपात जगात नित्य नांदण्याच्या निश्चयाने रामकृष्णांनी अखेरचा श्वास सोडला.


या श्वासातून उभा राहिला तो रामकृष्ण-संघ. आज जगात अनेक राष्ट्रांत आपले काम करीत तो उभा आहे. न्यूयॉर्कपासून सिंगापूरपर्यंत, कोलकातापासून म्हैसूरपर्यंत जागोजाग त्याचे अस्तित्व जाणवते. आजन्म ब्रह्माचर्याचा अंगिकार करणारे, अनेक वर्षांच्या पूर्वतयारीनंतर दीक्षेस पात्र ठरलेले, इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असणारे अनेक संन्यस्त तेथे आपणास भेटतात. पुणे, मुंबई, नागपूर, बेळगाव अशा नगरात पण त्यांचे दर्शन घडते. ज्ञानदान, समाजसेवा, मानवरूप माधवाची पूजा हेच त्यांचे कार्य! विवेकानंद नावाचा एक निदिध्यास अशा रीतीने आजही भूतलावर अखंडितपणे नांदतो आहे.

( क्रमश:)


- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

साधनेचा परिमळ - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग १०)


एखाद्या नवलकथेत किंवा कल्पित कादंबरीतही ज्या प्रसंगांचा समावेश केला जाणार नाही ते रामकृष्णांच्या जीवनात घडत होते. कलकत्त्यात बुद्धिवादी लोकांचा एक गट होता. तो रामकृष्णांच्या अनुभवांची मानसशास्त्रीय मीमांसा करू पहात होता. त्याला रामकृष्णांचे भलेपण मान्य होते; पण अनुभव अमान्य होते. मृगजळाचा प्रवाह हा एक भास असतो. त्याच कोटीतली ही दर्शने होत, असे त्यांचे मत होते. रामकृष्ण आपल्या जगात रमले होते. त्यांना इतरांच्या अभिप्रायांची तमा नव्हती. त्यांच्या साधनेचा परिमळ सर्वत्र पसरू लागला. 1875 साली केशवचन्द सेन रामकृष्णांना भेटले. ते ब्राह्मा समाजी होते. मूतिर्पूजा मानत नव्हते. गुरू हे पद त्यांना अनावश्यक वाटत असे. मात्र रामकृष्णांचे निर्मळ जीवन त्यांना प्रभावित करीत असे. ते कालीच्या एका पुजाऱ्याला महत्व देतात ही गोष्ट अनेक अभ्यासकांना रूचत नसे.

विवेकानंदांना याच गोष्टीचे नवल वाटे. ते स्वत: ब्राह्मा समाजाचे सभासद झाले होते. त्यांना परमार्थाची बैठक हवी होती. बुद्धिनिष्ठ अशा ब्राह्मा समाजाकडून ती प्राप्त होईल या आशेने व ओढीने ते नियमितपणे ब्राह्मा समाजाच्या प्रार्थनासभांना जात. या सभेतील कांही व्यक्तींना रामकृष्णांचे आकर्षण वाटू लागले. कलकत्ता शहरातील अनेक मोठी माणसे रामकृष्णांच्या भेटीसाठी मुद्दाम जाऊ लागली. विवेकानंदांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य हेस्टी हेसुद्धा रामकृष्णांना भेटत.


एकदा वर्गात वर्डस्वर्थची कविता शिकवताना व भावसमाधी या स्थितीचे विवरण करताना प्राचार्य हेस्टी यांनी विद्यार्थ्यांना रामकृष्णांकडे जाऊन या व प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा असे सुचविले.


प्राचार्य हेस्टी यांनी अनेक विदेशी विद्यापीठात व्याख्याने दिली होती. त्यांचे भाषाप्रभुत्व आणि विषयप्रभुत्व निविर्वाद होते. त्यांना नरेन्दनाथ दत्त हा बुद्धिमान विद्याथीर् अतिशय प्रिय होता. एकाच वाचनाने गहन ग्रंथ सहज स्मृतिगत करणारा असा विद्याथीर् मी कोठेच पाहिला नाही, असे ते म्हणत. आदर्श प्राध्यापक आदर्श विद्यार्थ्यांकडे ओढले जातात. विद्येच्या प्रेमात पडणारे अनेकदा परस्परांच्या प्रेमात पडतात. निरासक्त व निर्मळ जीवांना वाटणारे हे आकर्षण गुरुत्वाकर्षणाप्रमाणे स्वाभाविक असते.


विवेकानंदांना कोणी तरी मार्गदर्शक हवा होता. अवतीभवती विद्वान माणसे होती; पण ती ऐहिक वैभवामागे लागली होती. जीवनाचा अर्थ व परमेश्वराचे अस्तित्व अशा गोष्टींचा विचार त्यांना परवडत नव्हता.

विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दत्त वयाच्या पंचविसाव्या वषीर् संसारनिवृत्त झाले व घरदार सोडून रानावनात चालते झाले. त्यांचे वडील मात्र तसे व्यासंगी, रसिक; पण निरीश्वरवादी होते. माणसांना संसारातून व मुलाबाळातून उठवणारा देव ही मतिमंदांनी केलेली उठाठेव आहे असे त्यांना वाटे.


मुलाला त्यांनी शाळेत धाडले; पण अभ्यासाची सक्ती केली नाही. विचार कर. निर्भय रहा. जग पहा. जीवनाचा अनुभव घे. स्वत:चे निष्कर्ष स्वत: काढ. अनुभवाची उसनवारी करू नकोस. हे वडिलांचे सांगणे विवेकानंदांना आवडे. पालकांची प्रांजलता मुलांना बळ देते. आपला मुलगा सर्वत्र संचार करतो. थोरामोठ्यांना भेटतो. उत्तम गातो. कशाच्या आहारी जात नाही. कोणाच्या भजनी लागत नाही. या गोष्टींचा वडिलांना अभिमान वाटत असे. भावी जावई म्हणून त्याच्याकडे पाहणारे कांही धनिक पिते त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत याची त्याना कल्पना होती; पण या बाबतीत ते मुग्ध होते. नरेन्दाला लग्न नको, संसार नको हे त्यांच्या लक्षात आले होते. विरक्तीचे हे चंदन अधिक उगाळले तर काय होईल ते त्यांना कळत होते.

( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

एकच ध्यास! - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग ९)


रामकृष्णांच्या जीवनात एक प्रकारचे झपाटलेपण होते. रामकृष्ण आणि विवेकानंद या दोघांच्याही जीवनात बालपणापासून एक समान ध्यास होता. त्यांना परमेश्वर हवा होता. अनेक पारमाथिर्क जीवनाच्या आरंभी भग्नमनोरथ होतात व मग भगवंताच्या भजनी लागतात. त्यांची भावभक्ती ही एक प्रकारची उपरती असते. याउलट कांही साधकांना बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचा वेध लागतो. आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास हे या कोटीतले होत. रामकृष्ण आणि विवेकानंद या दोघांचा स्वाभाविक ध्यास हाच होता.

विवेकानंदांनी ज्ञानार्जनात जीवनाचा कांही काळ वेचला. उत्कटतेने व एकाग्रतापूर्वक अभ्यास केला. ज्ञानविज्ञानाच्या विविध क्षेत्रात संचार केला. हे करीत असतानाच देवाचा धावा केला; पण देव दिसेना, भेटेना, कळेना ही त्यांची हळहळ होती.


रामकृष्णांनी विद्याव्यासंगाचा ध्यास घेतला नाही. मात्र देवाचा अखंड धावा केला. ते अनुभवाच्या एका उच्च पातळीवर लवकरच स्थिरावले. दक्षिणेश्वराच्या कालीचे साक्षात् दर्शन घडेपर्यंत ते तळमळले, तडफडले. पुढे कालीची त्यांना नित्य सोबत घडू लागली. इतके घडले तरी त्यांचे समाधान नव्हते. ते परमार्थसृष्टीतील कोलंबस होते. त्यांना नवनवीन अनुभवक्षेत्रांचा शोध घ्यावा असे वाटत असे.


दिवसा मंदिरात आणि रात्री स्मशानात रामकृष्णांची साधना चालत असे. रात्री अंगावरचे कपडेदेखील उपाधीवत लेखून ते टाकून, काळोखाचे वस्त्र परिधान करून दिगंबर दशेत देवाला साकडे घालीत. जगाच्या दृष्टीने हा सगळा खुळेपणा होता. निखळ, निर्मळ खुळेपणा! रामकृष्णांवर कालीची कृपा झाली व तिनेच त्यांचे पारमाथिर्क पालकत्व पत्करले. अनेकांना हा सगळाच संभ्रम वाटत होता.


रामकृष्णांची ही स्वैर साधना चालू असताना तिला शिस्त लावणारी एक करडी शिक्षिका त्यांच्या जीवनात अवतरली. तिचे नाव होते भैरवी योगिनी. ही भैरवी अधिकारी साधकाच्या शोधार्थ होती. तिची वणवण चालूच होती. गंगेच्या काठी तिला रामकृष्ण दिसले आणि तिला खूण पटली. रामकृष्णांनीही तिला ओळखले आणि लहान मुलासारखे ते तिच्या दिशेने धावले. कांही वषेर् भैरवी योगिनी रामकृष्णांचे मार्गदर्शन करीत होती. तिची मनातून खात्री होती की हा एक अवतार आहे. तंत्रमार्ग हा तसा बिकट! कांही वादग्रस्त आणि अशोभनीय क्रियाकांडांनी किचकट झालेला आणि काळवंडलेला! पण या मार्गावरून चालूनही जे तरतील आणि उरतील ते महात्मे होत. भैरवीने बंगालमधल्या प्रतिष्ठित पारमाथिर्कांच्या सभेत हे सिद्ध केले की, रामकृष्ण हा अवतार आहे. वैष्णवचरण व गौरी पंडित यांनी हाच निर्वाळा दिला. दोन वषेर् तंत्रमार्गावरचे सर्व टप्पे विचारात घेऊन भैरवीने रामकृष्णांच्या साधनेला उजाळा दिला. सुमारे सहा वर्षांची सोबत आणि संथा पुरी करून भैरवी काशीला परत निघून गेली. तिचीही कांही तऱ्हा होती. तिचे कोणाशी जमत नसे. रामकृष्ण याला अपवाद होते. 1866 साली, म्हणजे रामकृष्णांच्या तिसाव्या वषीर् तोतापुरी नावाचा एक वेदान्ती दक्षिणेश्वरी आला. तो निर्गुण ब्रह्मा मानत होता. मूतिर्पूजा करीत नव्हता. रामकृष्णांकडे पाहून तो प्रभावित झाला. त्याने रामकृष्णांना निविर्कल्प समाधी साधन समजावून दिले. यापुढे कांही वषेर् ही साधना करीत रहा असे तो म्हणाला; पण नवल असे की दोन-तीन दिवसांच्या बैठकीत रामकृष्णांनी भरारी घेतली व ते सहजसमाधी स्थितीपर्यंत पोहोचले. तोतापुरी थक्क झाला. जो सगुण उपासना मानत नव्हता, मंदिरात जात नव्हता, देवाला नमस्कार करीत नव्हता, ''अहं ब्रह्मा अस्मि'' या अवस्थेपर्यंत पोहोचला होता व ज्याने त्यासाठी चाळीस वषेर् घोर साधना केली होती त्याला रामकृष्णांची ही भरारी आश्चर्यजनक वाटली. परमार्थाचे आकाश रामकृष्णांपुढे थिटे पडले. इस्लाम हा मूतिर्वाचून उपासना करणारा ईश्वरनिष्ठांचा धर्म आहे, असे रामकृष्णांना वाटले. गोविंद राय नावाच्या एका साधकाने रामकृष्णांना नमाज पढावेत कसे हे शिकवले. रामकृष्ण सर्व हिंदू दैवतांना विसरून अल्लाचे ध्यान करू लागले. या अवस्थेत त्यांना एका दिव्य पुरुषाचे दर्शन घडले. बहुतेक ते पैगंबरसाहेब असावेत अशी कांही जाणत्यांनी ग्वाही दिली. 1874 साली येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनात प्रकटले. अंतर्धान पावलेले अवतार रामकृष्णांवर प्रसन्न झाले.

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती

मूर्तीच्या जागी सगुण हवेत - शिवाजीराव भोसले ((भाग ८)


विवेकानंदांना ग्रंथाचे वेड होते; पण जीवन हाच एक ग्रंथ आहे हे ते विसरले नव्हते. जीवनग्रंथाची पाने अनुभवाच्या अक्षरांनी भरली तरच त्याला अर्थपूर्णता येते. पढिकता किंवा पांडित्य जीवनाला शोभा आणू शकतात; पण जीवनाचे सार्थक साक्षात्काराने होते. उत्कट अनुभवाने ते घडते. हा अनुभव हा ज्याचा त्याने घ्यावयाचा असतो. ''अनुभवेवीण ज्ञान। हे अवघेचि अप्रमाण'' असा निर्वाळा साधुसंतांनी दिला आहे.

विवेकानंद हे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. मिल्ल या तत्त्वज्ञांचे कांही लेख वाचून व जगातील दैन्य, दु:ख पाहून त्यांचा ईश्वराच्या कर्तृत्वावरचा विश्वास डळमळला होता. त्याच्या अस्तित्वाविषयी ते साशंक झाले होते. देव नसेल तर तसा ठाम निश्चय झाला पाहिजे. तो असेल तर त्याचा साक्षात् अनुभव घेतला पाहिजे, असे त्यांचे विचारचक्र वेगाने फिरत राहिले. त्यांना केवळ वाचनात रस नव्हता. अनुभव नावाचे प्रमाण हेच काय ते विश्वसनीय असू शकते अशी त्यांची ठाम समजूत होती. ईश्वर हा अनुभवाचा विषय झाला पाहिजे. ईश्वराविषयी युक्तिवाद करणे हा त्याच्या प्रत्यक्ष प्राप्तीचा मार्ग नव्हे; पण मूळातच तो नसेल तर त्याचा अनुभव तरी कसा घेणार?


सगळेच अशुद्ध आणि अवघड झाले होते. हा विषय सोडून देता येत नव्हता. तो मनाचा हेका होता. तो उलगडून पहाणे शक्य नव्हते. हे कोडे कोणी उकलील का? हे स्वामींचे आर्त होते.


कांही समकालीन परमार्थपुरुष आपल्या ज्येष्ठत्वानिशी समाजप्रबोधन करीत होते. देवेन्दनाथ टागोर, केशवचन्द सेन असे काही प्रज्ञावंत होते. त्यांच्या प्रवचनसभा होत. उपासना मंडळे चालत; पण हे भावनिक समाधानाचे मार्ग होते. त्यात साक्षात् अनुभवाचा भाग नव्हता.


एकूण परिस्थिती जर अशी धूसर असेल व मानवी जीवनावर सतत संदेहाचे अभ्र दाटणार असेल, तर जीवनातला काळोख संपणार कसा? देव नसेल तर तो दिसणार कसा? पण जगातील प्रत्येक भाषेत देव हा शब्द आला कोठून आणि कसा?


हे सर्व आपले आपणच शोधावे लागेल. कोणी अनुभवदाता हा आपला त्राता होण्याची शक्यता दिसत नव्हती. प्रश्ान् पडत राहणे; पण ते न सुटणे म्हणजे केवळ चित्ताची काहिली होय. विवेकानंदांच्या वाट्याला ती आली होती. या काळोखात एक आशेचा किरण दिसून लागला. तो म्हणजे रामकृष्ण परमहंस! ''देव दिसू शकतो. मी तो रोज पाहतो. तुलाही हे देवदर्शन घडू शकेल. तुझे डोळे हे योग्याचे नेत्र आहेत. तू हताश होऊ नकोस. निराश होऊ नकोस. विचार सोडू नकोस. तू माझ्याकडे येत रहा. आज माझ्या डोळ्यांना जे स्पष्ट दिसते ते तुझ्या डोळ्यांना उद्या साक्षात् दिसेल. तुझे डोळे हे असामान्य अधिकारी पारमाथिर्काचे नेत्र आहेत.''


आरंभी एका समारंभप्रसंगी रामकृष्णांनी नरेन्दनाथ या विद्यार्थ्यास पाहिले. त्याच्या भावमधुर भक्तिगीतांनी ते भारावले. त्यानंतर त्यांनी त्याला दक्षिणेश्वराला येऊन जावयास सांगितले. पुढे पुढे हे भेटीचे योग वाढत गेले. पहिल्या एक-दोन भेटीत रामकृष्णांच्या स्पर्शाने कांही विलक्षण अनुभव आले. भावविवश न होता या अनुभवाचे कठोरपणे मूल्यमापन करताना विवेकानंदांना कसलीही हळहळ वाटली नाही.


विवेकानंदांना देव हवा होता. रामकृष्णांनी तो पाहिला होता. हे दर्शन तुलाही घडेल, असा आशीर्वाद त्यांनी विवेकानंदांना दिला होता. त्या प्रकारचे अनुभव विवेकानंदांना येऊ लागले होते; पण त्यांना ते निरभ्र व निविर्वाद वाटत नव्हते. शास्त्रज्ञाच्या जिज्ञासेने व साशंकतेने त्या अनुभवाकडे ते पहात होते.


पहिल्या भेटनंतर पुढची साडेपाच वर्षे गाठीभेटी, संवाद आणि वादविवाद हे सत्र चालतच राहिले. केशवचन्द सेनांनी व्यक्त केलेल्या भावनांमुळे अवघा बंगाल रामकृष्णांकडे वळला. अनेक सुविद्य, सुजाण, पारमाथिर्क रामकृष्णांच्या आश्रयाला आले.


प्रत्यक्ष अनुभवांच्या प्रकाशात साक्षात्कारमीमांसा करणारा हा अधिकारी पुरुष साक्षरतेच्या पहिल्याच पायरीवर थांबला होता. पांडित्याचा जिना त्याच्यापासून बराच दूर होता; पण अनुभवाचे आकाश त्याच्या खांद्यावर टेकले होते. तो अनुभवासाठी आसुसलेला होता. अन्य साधकांचे अनुभव पण अभ्यासत होता.


रामकृष्ण परमहंसाचे जीवन ही परमार्थाची उतारपेठ होती.


देवाच्या सख्यत्वासाठी त्यांनी बालपणापासून सर्व सुखांचा त्याग केला होता. कनक आणि कांता या दोन प्रलोभनांपासून ते आजन्म दूर राहिले. त्यांचे लग्न झाले होते. त्यांची पत्नी शारदामणी ही त्यांची साक्षात्कार सांगाती झाली होती. जगाच्या दृष्टीने सगळेच विचित्र होते. देव हवा होता तर लग्न कशाला करावयाचे? लग्न केले तर पत्नीचे सौभाग्य साधनेने कशाला सजवावयाचे? वैराग्याच्या आकाशात उपासनेच्या वावड्या उडवावयाच्या आणि बायकोला मूल टाळून चूल फुंकायला लावायची हा केवळ खुळेपणा नव्हे काय?


असे घडले होते हे खरे; पण यात कोणी कोणावर कांही लादले नव्हते. रामकृष्णांनी पत्नीचे स्वाभाविक हक्क मनाने मान्य केले होते. त्यांची तशी तयारी होती; पण शारदामणी हे रामकृष्णांच्या घरकुलातील देवीचे दुसरे रूप झाले. देहधर्मापलीकडे असणारे विशुद्ध भावनांचे देवघर हे शारदामणींचे स्थान ठरले. रामकृष्णांचे सर्व शिष्य त्यांना माताजी म्हणत.


रामकृष्णांचे मूळ नाव गदाधर चतजीर्. लहानपणापासून भावमग्न दशेत काळ कंठणारा एक मुलगा ही गावकऱ्यांच्या दृष्टीने त्यांची एक प्रतिमा! शाळेविषयी मनातून तिरस्कार. गावात असणाऱ्या मंदिरात आणि बाहेर असणाऱ्या धर्मशाळेत सततचे वास्तव्य. गंगास्नानासाठी जाणाऱ्या धर्मयात्रिकांच्या विसाव्याचे एक ठिकाण म्हणजे कामारपुकुर हे गाव. या गावातला हा एक मुलगा.


पुढे त्याला कलकत्त्याला जावे लागले. तेथे संस्कृत पाठशाळा चालविणाऱ्या त्याच्या वडिल भावाच्या हाताखाली मदतनीस म्हणून तो राहू लागला. योग असा की त्याला आणि त्याच्या भावाला राणी रासमणी नावाच्या एक सधन महिलेने बांधलेल्या कालीमंदिरात नित्य पूजाअर्चा करण्याचे काम मिळाले. तो सगळा मंदिर परिसर काली, शिव, विष्णु अशा अनेक दैवतांच्या उपासनेमुळे भावसंपन्न झाला होता. काली ही त्या परिसरातील प्रधान देवता होती. राणी रासमणी ही कोळी समाजातील होती. त्यामुळे तिच्याकडे काम करण्याची उच्चवणीर्यांची तयारी नव्हती. पौराहित्त्याअभावी मंदिरातील देव पूजाअर्चा, नैवेद्य याशिवाय गाभाऱ्यात स्थानबद्ध होणार होते. यातून सुटकेचा मार्ग काढला तो रामकृष्णांच्या भावाने. त्याने सांगितले : ''हा मंदिर परिसर एखाद्या शुचिर्भूत ब्राह्माणाला दान करा. मग हरकतीचा मुद्दा संपेल.'' हे घडले व लगोलग पोटाथीर् पुजाऱ्यांची परवड सुरू झाली. राणीने सर्वांना अंतरावर ठेवले. रामकृष्ण आणि त्यांचे बंधू या दोघांना हा मान दिला. मंदिर परिसरात त्यांच्या निवासाची सोय केली. रामकृष्णांनी अवघडलेल्या अंगाने हे काम पत्करले; पण लवकरच ते त्या कामात गढून गेले. पूजा पाठ ही एक आराधना होती. ती पोटासाठी आरंभलेली पारंपरिक कसरत नव्हती. रामकृष्णांना देव प्रत्यक्ष पहावयाचा होता, जाणावयाचा होता. ते करता यावे यासाठी ते साधनाभूमीच्या शोधार्थ होते. दिसेल त्या मंदिरात थांबत होते. पाणावलेल्या डोळ्यांनी मूतीर्कडे पहात होते. प्रसंगी तिच्याशी बोलत होते. कालीमंदिरात हे नित्याने घडू लागले, काली ही त्यांची माता झाली. तिच्याजवळ ते नानाप्रकारे हट्ट करीत. इतरांना जेथे केवळ मूतीर् दिसत होती, तेथे रामकृष्णांना सचेतन, सगुण, साक्षात् जगदंबा दिसत होती.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

गुणवत्तेचे संगोपन - शिवाजीराव भोसले (भाग ७)


विवेकानंदांच्या वाट्याला आलेले आयुष्य चाळीस वर्षांपेक्षा थोडे कमीच होते. त्या जीवनाला प्राप्त झालेली परिमाणे विलक्षण होती. सामान्य माणूस एका गावी जन्माला येतो. शिक्षण, व्यवसाय, राजकारण अशा काही व्यापामुळे त्याला अनेक गावे पहावी लागतात. हे पाहणे वरवरचे असते. कोठे मुद्दाम राहणे व अवतीभवतीचा परिसर बारकाईने पाहणे घडत नाही. माणसे कोठून तरी निघतात व कोठे तरी पोहोचतात. थोडी थांबतात आणि पुन्हा त्याच मार्गाने परत फिरतात.

विवेकानंद काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरले. काही काळ हिमालयात राहिले. पदवीधर होईपर्यंत कलकत्ता हे त्यांच्या जीवनाचे केंद होते. रामकृष्ण परमहंसांचा सहवास त्यांना साडेपाच वषेर् लाभला. हा स्थैर्यकाल लवकरच संपला.


स्वामीजींना आपल्या गुरूच्या निर्वाणानंतर एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली. त्या बरोबरच समाज आणि देश जवळून पाहण्याची इच्छा बळावली. मागे प्रपंच नव्हता. आई आणि भावंडे, आपले गुरुबंधू असे काही पाश होते; पण स्वामीजी त्यातून निग्रहपूर्वक बाहेर पडले आणि संन्याशाचे गाणे गात पुढे चालत राहिले. अयोध्या, वृंदावन, नैनिताल, ऋषिकेश, दिल्ली, मीरत, बडोदा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बंगलोर, म्हैसूर, बेळगाव, पणजी त्रिवेंदम, मदास, हैदाबाद अशा अनेक गावी आणि स्थानी त्यांचा रहिवास घडला. नंतर ते शिकागोला गेले. साडेतीन वषेर् त्यांनी विदेशात वास्तव्य केले. तिकडे व्याख्याने दिली, अभ्यासवर्ग चालविले, एक लहानसे शिष्यमंडळ उभे केले.


या त्यांच्या जीवनाला विलक्षण वेग होता. मोठी माणसे आपल्या एका आयुष्यात अनेकांचे अनेक जन्म अनुभवतात. जीवनदेवतेची नाना रूपे अभ्यासतात. ज्ञानकोशाचे खंड चाळणे, व्याकरणकारांची मते अभ्यासणे, स्वत: स्वतंत्र चिंतन करणे, लोकजीवनाशी अखंड संवाद साधणे या सगळ्या गोष्टी काही व्यक्तींना कशा साधतात ते कळत नाही.


विश्व हेचि माझे घर या वृत्तीने जगणे व त्याचवेळी आत्मलीन दशेत ध्यानधारणा करणे ही जीवनशैली असामान्य या कोटीतली आहे.


विवेकानंदांचे आगळेपण व अधिकार हा त्यांचा या जीवनशैलीत आहे.


परप्रांतात, परदेशात, परमुलुखात संचार करणे व परभाषेत लोकांशी संपर्क साधणे हे ज्यांना जमते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची परिमाणे विलक्षण असतात.


रोमा रोलाँसारख्या नोबेल पारितोषिकाच्या मानकऱ्याला रामकृष्ण-विवेकानंद ही चरित्रे लिहिण्याचा मोह पडला. विवेकानंदांच्या एकेका वाक्याने मी थरारून उठलो, कंपायमान झालो असे त्यांनी म्हटले आहे.


हे विचारात घेतल्यावर असे वाटते की, विवेकानंद हा एक अभ्यासविषय झाला पाहिजे.

विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवादिन म्हणून देशभर साजरा व्हावा अशी अपेक्षा देशाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली होती; पण स्मृतिदिन ही एक कवायत ठरण्याचा संभव असतो.

त्यांच्या जीवनात जे उत्कट आणि अनुकरणीय ते अगत्यपूर्वक अभ्यासले पाहिजे. विवेक आणि वैराग्य ही त्यांची बलस्थाने होती. अखंड आणि प्रचंड व्यासंग, निरंतर कार्यमग्नता हे त्यांचे स्थायीभाव होते. मद्य आणि मदिराक्षी यापासून ते निलेर्प राहिले. त्यांनी योगाभ्यास केला व पातंजल योग उत्तम इंग्लिशमधून इंग्रजांना समजावून दिला.


जो जो विवेकानंद अभ्यासले जातील तो तो आपले जीवन विवेकानंदमय व्हावे या आकांक्षेचे भरते येत राहील. स्वत: स्वामीजींची ही अपेक्षा किंवा तृष्णा नव्हती. ज्याने त्याने आत्मनिर्भर असावे व आत्मोन्नतीच्या मार्गाने जाऊन आत्मतृप्त व्हावे ही स्वामीजींची शिकवण होती.


जे आत्मरत, आत्मतृप्त व आत्मपर्याप्त असतील अशा व्यक्तींकडे समाजाचे नेतृत्व जावे. ज्यांना प्लेटो फिलॉसफर किंग, म्हणजे तत्त्वज्ञ राज्यकर्ता म्हणत असे अशा जाणत्या व्यक्तींची संख्या वाढणे हाच खरा उत्कर्षमार्ग आहे.


ध्यानधारण, विद्याव्यासंग, समाजसेवा ही साधनेची अंगे परस्परसंलग्न आहेत. व्यक्ती आणि समाज यातील अद्वैत हे एक दुर्लक्षित सत्य समजावून घेतले पाहिजे. आसन प्राणायम ही झाली व्यक्तिगत साधना. शिक्षण, आरोग्यसेवा, आपत्ती निवारण, शेती, पशुपालन या बाबी सामाजिक संदर्भात साकार होतात.


गुणवत्तेच्या संगोपनासाठी व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर कार्यरत राहिले पाहिजे. 'रामकृष्ण मठ' आणि 'रामकृष्ण मिशन' यांची स्थापना या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी झाली.


मठात राहून साधना करावी. वाचन, लेखन, प्रकाशन करावे. मिशन या माध्यमातून नानाविध सामाजिक प्रकल्प सिद्धीस न्यावेत. कोयना आणि किलारी भागातील भूकंपग्रस्तांचे पुनर्वसनाच्या दृष्टीने रामकृष्ण मिशनने केलेले काम म्हणजे विवेकानंदांच्या मनोरथाची पूर्तता करण्याचा एक प्रयत्न होय. देशाच्या इतिहासातील अन्य आचार्यांपेक्षा विवेकानंदांचे असे एक वेगळेपण मानावे लागते ते त्यांच्या क्रियाप्रवणतेमुळे.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले