संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Monday, October 11, 2010

जय हो !!!!!!

भारताकडून पाकचा ७-४ गोलने धुव्वा


(11-10-2010 : 12:07:41)

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यापासून प्रथमच प्रेक्षकांनी संपूर्ण भरलेल्या मेजर ध्यानचंद आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये भारताने पाकिस्तानचा ७-४ गोलने पराभव करून उपांत्य फेरीत पराभव केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष करून स्टेडियम डोक्यावर घेतले.सुरुवातीपासूनच आत्मविश्वास व आक्रमक खेळ करणाऱ्या भारतीय संघातील ड्रॅग फ्लिकर संदीप सिगने २ गोल नोंदवून पाक संघाला धक्का दिला. योग्य समन्वय, नियोजनबद्ध रचलेले डाव यामुळे भारतीय खेळाडूंनी हा विजय प्राप्त केला. पूर्वार्धातच भारतीय संघाने ४-२ ने आघाडी घेतली होती. या वेळी संदीप सिगने तिसऱ्या व ११ व्या, शिवेंद्र सिगने १९ व ६० व्या, सरवनजित सिगने २० व्या, दानिश मुज्तबाने ४१ व्या व धरमवीर सिगने ४६ व्या मिनिटाला गोल केले. पाकिस्तानकडून मोहम्मद इमरानने २७ व्या, मोहम्मद रिजवान २९ व ५७ व्या व शकील अब्बासीने ६८ व्या मिमिटाला गोल केले. सामना संपल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी, क्रीडामंत्री एम.एस. गिल, आयोजन समितीचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment